वाढ्याशीं नेहमीं सख्य असणे, किंवा राहणे, अशक्य आहे; म्हणून जो बलवान्
असेल त्याने दुसऱ्यास जिंकावें; कारण आत्मबलाशिवाय सुरक्षितपणा मिळणे
शक्य नाहीं; व राजकारणात बलाशिवाय दुसरी नीति ही नाहीं; त्या प्रमाणेच
युक्ति व भेद या दोन्हीं ही गोष्टी राजकारणांत आवश्यक आहेत, म्हणून राजाने
हेर ठेवून त्यांची सर्व राजकाजांत नेहमीं अत्यंत मदत घेत राहिले पाहिजे.
गुप्तहेर:- या काळांत गुप्त हेरांचं काम करण्याकडे कसबिणीचा धंदा
करणाऱ्या स्त्रियांचा उपयोग केला जात असे; यासंबंधानें बरेच नियम केलेले
आढळतात; त्या प्रमाणेच गुप्त बातम्या आणणाऱ्यांना विशेष मुभा अथवा
सवलती दिल्याचाही उल्लेख आढळतो.
विक्रीवरील करः - तटबंदीच्या शहरांत मालाच्या विक्री प्रमाणे कर घेतला
जात असे; धान्य, गुरें, व आणखी कांहीं जिनसा, याशिवाय करूनच्या बाकी
सर्व जिनसा, जकातीच्या नाक्यावर विकाव्या लागत असत; परगांवचे आयात
मालावर, शेकडा वीस टक्के, या प्रमाणे कर असे. तथापि पुष्कळ जिनसांवर
शेंकडा चार ते सहा टक्के कर असे; व जड जवाहिरांवरील कराचे दर बरेच
अधिक प्रमाणांत असत.
खाने सुमारी खातें: – या खात्यावर नागरक या नांवाचा एक
अधिकारी असे; व त्याच्या हद्दीत जीं नवीं माणसे येतील, अथवा गांवांतील व
इतर परगांवीं जातील, त्यांची नोंध करण्याचे काम त्याच्याकडे असे; शिवाय
प्रत्येक मनुष्याची जात, नांव, अडनांव, धंदा, उत्पन्न, गुरें, खर्च, स्त्री, अथवा
पुरुष, वगैरे माहिती गोळा करण्याचें, व ती संग्रहित करून ठेवण्याचे कामही
त्याच्याकडेसच सोपविण्यात येत असे.
खोटी माहिती देणेः-- खोटी माहिती देण्याबद्दल अथवा दिल्याबद्दल,
चोरीच्या गुन्हया प्रमाणेच, शरिराचा एखादा अवयव तोडणे, ही शिक्षा देण्यात
येत असे.
मद्य विक्रीः- मद्य विक्री साठीं परवाने घ्यावे लागत असत; आणि परदेश-
तून येणाऱ्या मद्यावर विशेष कर टेविलेले असत; दारूच्या दुकानांत गि-हाइ-
कास बसण्या करितां पलंग, खुर्चा वगैरे सोई कराव्या लागत, आणि ऋतूमाना
प्रमाणे शेगड्या, पंखे, सुवासिक फुलें, अत्तरें, बगैरे जिन्नस सुद्धां दुकानांत ठेवावे
लागत असत.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२२२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०३ )