अनेक क्रांत्या झाल्या; आणि पठाण, मोंगल, मराठे, शीख व इंग्रज हे क्रमाक्रमानें
हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले; परंतु ग्रामपंचायती पूर्वी होत्या तशाच कायम
आहेत; गांवांतील जमातींचे अथवा पंचायतींचें, प्रत्येक जण आपापले लहानसे
स्वतंत्र राज्य त्यांत बनवून, असणारें हैं ऐक्य, हे हिंदू लोकांच्या सुखांस आणि
बहुताशीं स्वातंत्र्य व मोकळेपणा यांना कारणीभूत झालेले आहे. +
ग्राम पंचायती प्रमाणेच, प्राचीन आर्य लोकांचे शील कसें होतें, म्हणजे
त्यांची दानत ( Character ) किती प्रसंशनीय होती, या विषयीं ही इतिहासांत
अनेक निरनिराळ्या प्रकारचे व प्रसंगाचे दाखले आढळतात; सत्य हा जगाचा
ज्ञानदीप आहे; शील ओळखण्याचे मुख्य साधन सत्य है आहे; सत्य ही जगां-
तील पवित्र, भेष्ट, व अविनाशी वस्तू आहे; आणि मानवी जगांत सत्य हा श्रेष्ट
तम, प्रधान व अमोल्य असा माननीय सद्गुण म्हणून मानिलेला असून मानवी
प्राण्याच्या आयुष्यांत त्यास तो तारक म्हणून, ब त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या
सद्गतीस मार्ग दर्शक व मदतगार म्हणून, ठरलेला आहे. आणि सत्याच्या नर-
डीस नख देणारा मनुष्य कुमार्ग गामी होण्यास प्रारंभ होऊन, संवईने अट्टल
खोटे बोलणारा म्हणून मानिला जाऊन तो सत्य भाषणीं व सत्याचरणीं समाजां-
वील महारोग म्हणून गणिला जात आहे; या बाबतींत ऐतिहासिक दाखले देऊन
असें निर्विवादपणे सिद्ध करून देता येईल कीं, अनादि काला पासून हिंदू
लोक हे सत्यवादी म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि तशी त्यांची सर्व देशांतील
व सर्व जातींच्या लोकांनीं तारीफ केलेली आहे. या बाबतींत स्ट्राबो म्हणतो
The villege communities are little republics having near-
ly every thing they can want within themselves and almost indepen-
dent of any foreign nation. They seem to last where nothing else
iasts Dynasty after dynasty tumbles down, revolution succeeds revo-
lution, and Pathan, Moghal, Mahratta, Sike, British, are all masters
in turn, but the village communities, romain the same. This union of
village communities, each one forming a seperate little state in itself,
is in & bigh degree conducive to their ( Hindu's ) happiness, and to
the enjoyment of a great portion of freedom and independence"
(See Report of the Select Committee of the House of
Commons; 1832. Vol. III. Appendices Page 33.