बाबाजी दातार व सोहनी यांची घेत. रा. नरहरबुवा
यांनी नाटककंपनीवर पुष्कळ पैसे मिळविले; व मद्रास,
तंजावर, काशी, वगैरे हिंदुस्थानांतील दूरदूरच्या प्रदे-
शांत त्यांनी प्रवास केला. वरील तिन्ही चारी कंपन्यांत
जे इसम होते ते बहुतेक भागीनेच होते; व दोन तीन
वर्षांची सफर करून आले म्हणजे हिश्शेरसीप्रमाणे पैसा
वाटून घेत असत. कोल्हापूरकर नरहरबुवा यांची कंपनी
पंचवीस तीस वर्षे चांगल्या रीतीने चालली होती, व ती
नुकतीच पांच सहा वर्षांखाली मोडली.
वरील निरनिराळ्या कंपन्यांकडे किंचित् बारकाईने
नजर फेंकली झणजे असे दिसून येईल की, त्या सर्वांचा
उदय सांगली व त्याच्या आसपासच्या भागांत झाला.
आणि याचे कारणही उघडच आहे की, मळ भावे यांची
कंपनी सांगलीस निघाल्यामळे तिकडील लोकांना नाटकाची
माहिती प्रथम झाली, व कांहीं फुटाफुटीने व कांहीं अनु-
करणाने तिकडे नवीन कंपन्या अगोदर झाल्या; व ह्या
कंपन्या जशा चोहोंकडे फिरू लागल्या तशी लोकांना नाट-
काची गोडी लागून निरनिराळ्या ठिकाणी नव्या नव्या
कंपन्या होऊ लागल्या; व आतांपर्यंत आस्तित्वांत
आलेल्या व लयास गेलेल्या सगळ्या कंपन्यांची कोणी
मोजदाद करूं लागेल तर त्याला त्या शंभराहूनही
अधिक आढळून येतील असें आह्मांस वाटते. असो.
पान:मराठी रंगभुमी.djvu/42
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६
मराठी रंगभूमि.