पान:मनतरंग.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या बेशरम टोळक्याच्या म्होरक्याची पत्नी आपल्या अपराधी नवऱ्याला घरात घेत नाही. एवढेच नाही तर वैधव्याचे कपडे घालून, ज्या हातमाग कारखान्यात या मैत्रिणी जात असत तिथे जाते. आता त्या ठिकाणी असते फक्त श्रीदेवी, एकटी... हरवलेली. पण ही नवी मैत्रीण मिळाल्यावर तिला भास होतो की शान्ता, पार्वती, लक्ष्मी नव्या रूपात, नव्या जोमाने नवे धाडस घेऊन परतल्या आहेत.
 ही कथा मातृसत्ताक जीवनव्यवस्थेच्या खुणा आजही ज्या प्रांतात आढळतात त्या केरळातली आहे. मग इतर भागातील स्त्रियांच्या अनुभवाबद्दल काय बोलावे?
 तो चित्रपट पाहताना, चित्रपटाचे नाव वाचून आठवत होती, कवी कांतांची कविता -

"गोरे पान उरी केळीचे फाटते...."


■ ■ ■

मनतरंग / १२०