३८
बबुताईला थोडीशी शंका येऊन तिनें दादाला विचारलें: – "संतु-
दादा, आपली अर्धीगी कुठे आहे ? — "
“माझी अर्धीगी माझ्या भावी श्वरांच्या घरीं ! — माझ्या लग्नाचें
पुष्कळ -ह्मणजे अर्धे तरी जुळलें आहे ! ह्मणजे लग्नाची अर्धी तयारी -
मी, वर-तयार आहे ! वधूचें जमले कीं, झालेच शुभमंगल समजा ! "
" तशीच सुगंधाताईंच्या लग्नाची पण कांहीं तरी व्यवस्था केलीच
असेल ! " बब्रूताई हैं विचारतांना हंसत होती, आणि आपल्याला
आणखी हंसावयाला लागणार, म्हणून अपेक्षाही बाळगीत होती !---
"ताईला काय १ कोणीही चिंतुछाप वानर आपला संसार
थाटायला खुषीनें वधूदक्षिणा देऊन घेऊन जाईल ! त्याची नाहीं
मला काळजी ! बाकी आम्हीं वधूदक्षिणा घेणार नाही आहों, नाहीं तर
भलताच गैरसमज करून घ्याल ! -बरें आहे, बराच उशीर झाला आहे
तुम्हाला खालीं तुमचा ड्रायवर तुमची वाट पाहून पाहून कंटाळून
डुकल्या घेत असेल. तुमचा बहुत व अमूल्य वेळ घेतल्याबद्दल आम्हीं
क्षमा करतों तुम्हांला -या म्हणजे जाच आतां !" आतां तर बबूताईची
मुरकुंडी वळली " वा ! वा ! बरें येतें हं ! रत्नु- येऊं ना रे?..."
"अहो नव्या ताई, मी येऊं का तुमच्या मोटारींतून ?" रत्नु उड्या
मारीत मोंटारीकडे निघाला. पण तितक्यांत दादाचा डोळा मोठा झाले-
ला पाहतांच जागच्याजागीं थबकला !-
“ येतोस ? चल तर ! --नाहीं तर ताईबरोबर उद्यां परवां ये हं ! "
बबूताई बोलत बोलत मोटारींत जाऊन बसली. मी दादा, पांचवायला
खालींपर्यंत गेलो होतों.
"सुगंधाताई, संतुदादा, तुमच्या इथें आलें, पण मला किती आनंद
झाला म्हणून सांगूं ? असा आनंद मी जन्मांत आजवर कधीं अनु-
भवला नाहीं ! गरीचींत इतका आनंद असतो, याची मला कल्पनासुद्धां
नव्हती ! गरीब झाल्यावर जर नित्य इतका आनंद मिळणार असेल,
तर मी गरीच व्हायला एका पायावर तयार आहे !-खरेंच तुम्ही सगळे
जण कित्ती-कित्ती चांगले बोलतां !—"