पान:भूमी आणि स्त्री.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अतुलनीय शुद्ध स्त्री जीवन कशामुळेही डागाळले जात नाही. कोणत्याही कलंकांचा निरास दर महिन्याला करणारी शक्ती निसर्गतःच त्यांच्या ठायी आहे.
 कन्याराशी : एका हातात धान्याचा अंकुर दुसन्या अग्नी -
 अतिप्राचीन समाजात 'स्त्री' ही सर्जनाचा केन्द्रबिंदू मानल्याने त्यांच्या सर्व रुपांना समाजात सन्मान होता. निर्णयाचे स्वातंत्र्य होते. त्या करारी, शेतीउत्पादन करणाऱ्या, उत्पादनाचे कुलातयोग्यरीतीने वाटप करणाऱ्या, वस्त्र विणणाऱ्या, कुलवा त्या वसाहतीचे व्यवस्थापन करणाऱ्या असत. त्यामुळे आजही प्राचीन देवींची रूपे पाहिली तर त्यांच्या एका हातात धान्याचे कणीस तर दुसऱ्यात परशु वा शस्त्र दिसते. कन्या रास ही बारा राशीपैकी सहावी. दीपिका या ग्रंथात तिचे वर्णन, 'तिच्या एका हातात धान्याचा अंकुर व दुसऱ्या हातात अग्री असून, तिचे नौकेत उभी असलेली स्त्री' असे केले आहे. ती अग्नीसमान तेजस्वी आणि पृथ्वीसमान नवनिर्मिती करणारी असते असा समज समाजात होता. जिथे संवेदना असते तिथेच निर्मितीची शक्ती असते. व्यास महर्षिनी द्रौपदीचे व्यक्तिचित्र रंगवताना भाविनी, मनस्विनी, अग्निकन्या ही तीन विशेषणे वापरली त्या मागे हीच भूमिका असावी.
 सातपुड्यातील देवीमोगऱ्याची याहामोगी देवता समृद्धीची देवता आहे. तिला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ते नवे धान्य घरात आणत नाहीत. असाच रिवाज महाबळेश्वर परिसरातील ठाकर समाजात आहे. योगेश्वरीच्या हातातही धान्याचे कणीस आहे आणि ती कुमारिका आहे.
 हिंदुस्तानचे बदलते रूप आणि स्त्री -
 सर्वसाधारणपणे महाभारत काळापासून, अतिप्राचीन काळात स्त्रीचे समाजात असलेले स्थान आणि रूप बदलत गेले. पूर्ववैदिककाळात स्त्रीला नंतरच्या मानाने अधिक स्वातंत्र्य होते. ती वेदान्तचर्चेत गार्गीप्रमाणे भाग घेऊ शके. कुटुंबसंस्था उत्तरोत्तर पुरुषकेन्द्री झाली. तरीही पुनर्विवाह करण्यास तिला कसलीही आडकाठी नसे. मात्र शौर्ययुगात स्त्रीचे स्वातंत्र्य काहीसे हिरावले गेले. 'स्त्रीने वेदाध्ययन करणे हे देशात बजबजपुरी माजल्याचे लक्षण आहे' असे सांगून तिला अध्ययनापासून परावृत्त केले गेले.
 १०विल ड्युरांटच्या मते वैदिक हिंदुस्तानने (ख्रि.पू. २००० ते १०००)

भूमी आणि स्त्री
६७