पान:भाषाशास्त्र.djvu/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० भाषाशास्त्र. लोकांच्या मनाचा कोतेपणा विशेष रीतीने व्यक्त होतो. कारण, कोणतेही ज्ञान व्यक्तिविशेषावर अवलंबून नसल्यामुळे, ते जेथे जेथे उपलब्ध होईल, तेथे तेथे संपादन करण्याची इच्छा धरणें ज्यास्त श्रेयस्कर होय, हे कोणासही कबूल करावे लागेल. सूर्याचें तेज ग्रीस देशांत एक तव्हेचे असून अन्य प्रांतांत भिन्न प्रकारचे आहे, असे बिलकुल नाहीं. आणि हीच गोष्ट ज्ञानाला सुद्धां, तितक्याच अंशाने लागू आहे, यांत संशय नाही. कारण, । गुणाः पूजास्थानं गुणिषु नचलिंगं नच वयः ।। | आमचे आर्यपूर्वज खचितच अशा प्रकारचे नव्हते. | ते विशेष उदारमनाचे, पोक्तविचाराचे, पाश्रत्य गवांकि, वे आणि विशालबुद्धीचे असत. त्यामुळे, भारतीयांचे उदारमन. । त्यांच्या पासंगाला लागणारा क्वचितच कोणी दृष्टीस पडे. मात्र, ते स्वतः फारच धर्मशील होते; व ह्याच कारणाने ते धर्मभ्रष्टांस प्रसंगविशेषीं दस्यू, अनार्य, आणि म्लेच्छ ह्मणत. तथापि, आर्येतर लोक ज्ञानशील असल्याबद्दल जेव्हा जेव्हां त्यांची खात्री होई, तेव्हां तेव्हां ते त्यांस योग्य मान देत. एवढेच नव्हे तर, ते शास्त्रज्ञ असल्यास त्यांस यवनाचार्यही ह्मणत; व केवळ आय प्रमाणेच त्यांची ते प्रतिष्ठा राखीत. वराहमिहिर नांवाचा आमच्यांत एक मोठा नामांकित । ज्योतिषी होऊन गेला. त्याने देखील गुण हेच पूजास्थान । असे समजून, भारती- ज्योतिःशास्त्रांत यवनांची प्रगति पायांनी ग्रीक विद्वानांस हुन, त्यांस मोठा मान दिला आहे; दिलेला मान. | आणि ते ऋषीप्रमाणेच पूजनीय