Jump to content

पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४७]

उपाय नाही. परंतु दोघे सज्जन असतील तर त्यांचा प्रणय संबंध आजन्म टिकलाच पाहिजे. शेक्सपियरने म्हटले आहे:-

"सुपरीक्षित जो असे मित्र त्या, घट्ट प्रेमरशनांहीं ॥
आंवळूनियां हृदयीं ठेवी रत्न तयासम नाहीं ॥ १॥"

 बाकी अस्सल स्नेही जगांत विरळाच. त्यांची वाणी व करणी अंतःकरणपूर्वक असावयाची. त्यांना पराकाष्ठेची कळकळ व जीवाला जीव द्यावयाला तयार असे ते असतात, ते स्वतः आपल्यापासून गौप्य ठेवावयाचे नाहीत व आपणही त्यांच्यापासून ठेवू नये; परंतु दृढ मैत्री ठेवावी. असले मित्र अक्षयी जवळ करावे व त्यांना सदैव साह्य करावें. स्नेह्यास्नेह्यांचें जें प्रेमपरिपूर्ण संभाषण चालतें तें "म्लानस्य जीवकुसुमस्य विकासनानि" या योग्यतेचे असते. तथापि मित्रामित्रांनी कधी वादाच्या भरीस पडावयाचे नाही, हे लक्षात ठेविले पाहिजे. नाहीतर त्यामुळे प्रेमभंग होऊन स्नेहांत व्यत्यय यावयाचा. सख्ख्याला नेहमी समानशीलत्वाची जरूर असते- जसे तेलपाणी एकत्र केले तर भिन्न भिन्न दिसते; व दूधपाणी मिसळल्यास अक्षयी एकजीव होऊन रहाते. कोणालाही एकांतवास व मित्रविरहित आयुष्य आवडत नाही. आपल्या प्रेमाला विभागी कोणी तरी लागतोच- परंतु गीतेत सांगितल्याप्रमाणे अनुद्वेगकर, सत्य, प्रिय आणि हितकर असेच शब्द बोलण्याचा प्रत्येकाचा निश्चय