घटकेस विशेष प्रकारे म्हणता येणार नाही. मुलगे प्रौढ होतात, परंतु मुलींचे वय त्या मानाने बरेच कमी असल्यामुळे विषमविवाह होतात. बालविवाह शास्त्रसंमत नाहीं, हे तर सिद्ध झाललेंच आहे. त्यापासून शारीरिक ऱ्हास व राष्ट्रीय अवनति ही तर होतातच; परंतु सामाजिक अनहितही कित्येक प्रकारांनी होते. त्यांपैकी पहिलें:
अकाली मातृपद प्राप्त झाल्यामुळे लहान मुलांचे संगोपन अज्ञ बालिकांना करण्याचा प्रसंग येतो. त्यांच्या ठिकाणी योग्य तो मनोनिग्रह नसल्यामुळे मुलांची आबळ होते. युरोपियन लोकांच्या मुलांची आपल्या मुलांशी जर तुलना केली तर जमीनअस्मानाचा फरक दृष्टीस पडतो. आमच्यांतील मुलें जोमदार व मांसल न दिसतां अशक्त व फिकटलेली दिसतात. गतवर्षी झालेल्या खानेसुमारीवरून ५-१५ वर्षांच्या मुलींच्या मृत्युसंख्येचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आढळले. हा बालविवाहाचा परिणाम आहे.
दुसरे अनहित असें आहे की, मुलांच्या व मुलींच्या उभयतांच्या शिक्षणांत बालविवाहामुळे व्यत्यय येतो. एकदां विवाहशृंखला पायांत पडली की मुलांचे विचार निसर्गतः त्या बाजूला वळतात व त्यांच्या मनाची एकतानता नष्ट होते. मला असें एक उदाहरण माहीत आहे की, २१ वर्षांच्या अवधीत २।३ मुले झालेली तशांत बालपत्नीचा व त्या अर्भकांचा अजारीपणा, यामुळे एका
पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/20
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१५]