७३
सोन्याचा साव्हरिन ह्यांत वर्तमान स्थितीला सोइस्कर असें नवीनच प्रमाण ठर
वावें. हे जर करावयाचें नसेल तर दुसरे मार्ग म्हणजे ( १ ) नवोन रुपयांत
कमी वजनाची चांदी घालणे किंवा त्याचें वजन कमी करणे; ( २ ) किंवा हल्लींचा
रुपया पूर्वीप्रमाणे कायम ठेवून नवीन हलक्या वजनाचीं दोन किंवा तीन रुप-
यांची नाणी पाडणें; ( ३ ) किंवा निकलचे रुपये पाडणे; (४)
किंवा नोटाबद्दल रुपये देण्याची पद्धत कांही दिवस बंद ठेवणे; हे होत.
पण हे सर्व मार्ग कमिटीच्या दृष्टीनें टाकाऊं होते; कारण त्यामुळे लोकांत सरका-
राविषयीं फार अविश्वास उत्पन्न झाला असता. आज किती तरी वर्षे रुग्या
अस्तित्वांत आहे व त्याचे वजन व किंमत हीं ठरून गेलेली आहेत. ती किंमत
व तें वजन बदहणें म्हणजे फार धोक्याचें झालें असतें.
कमिटीच्या मताने अतिशय सोर्याचा असा हुंडणावळीचा दर म्हटला
म्हणजे १ रुपयास २४ पेन्स हा होय व हा दर पौंडाच्या किंमतीच्या नोटांत न
दर्शवितां सोन्यांत दर्शविला जावा. कारण त्यावेळी परिस्थिति अशी होती कीं,
सोन्याचे नाणे विलायतेंत फारसें प्रचारांत नव्हते, लोकांचे काम सरकारी
खजिना.धकारी ह्यांनी काढलेल्या नोटांवरच चालत असे व नोटांबद्दल सोनें
मिळण्याची मुष्कील असे; म्हणून ह्या नोटांची किंमत उतरली होती. अतएव
कमिटीनें अशी सूचना केली कों, रुपया व पौंडाची नोट ह्याचा संबंध न जोडतां
सोनें व रुपया ह्यांचा संबंध जोडावा, म्हणजे १० रुपयांला एक सान्दरिन असा
संबंध ह्यापुढे दोघांमध्ये असावा.
(४३) कमिटीच्या मुख्य सूचना:-:-वरील सूचनेनंतर आणखी
कांहीं कमिटीनें सूचना केल्या त्या अशा. सोन्याच्या आयात निर्गतीवर सरकारचा
ताबा नसावा व लोकांना ज्या तन्हेची चलन पद्धति हवी तीच सुरू असावी
असे जरी सरकारचें धोरण असले पाहिजे तरी होतां होईल तो सोनें सरकारच्या-
जवळच खजिन्यांत राहिले पाहिजे. कारण तें परदेशी व्यापारानिमित्त पाठवि-
पास उपयोगी पडते. मुंबईला मिंटची शाखा सोन्याचें सान्दरिन व हाफ्
साव्हरिन नाणे पाढण्याकरितां उघडली जावी; व ज्या अर्थी इल्लीं चांदीचा दुष्काळ