Jump to content

पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
भारतीय चलन पद्धति

फायदा सरकारास होत असतो, एखादा युद्धप्रसंगी किंवा कांहीं कारणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांत सरकारची पत उतरली म्हणजे सरकारास कर्ज काढणे फार कठीण जाते. अशा वेळी ह्या नोटा लोकांना विश्वासांत घेऊन व योग्य प्रमाणांत जर काढण्यांत आल्या तर सरकारला बहेर कर्ज काढण्याची जरूर पडत नाहीं.

 पण कागदी नोटा सर्वस्वी धातूच्या नाण्याशी कधोंदी बरोबरी करूं शकत नाहीत. कागदी नोटा काढतांना त्यांना जर सोन्याचांदीचा आधार असेल तरच त्या लोकप्रिय होतात. सरकारने दंडुकेशाही करून लोवर नोटा लदल्या तर लोक कांहीं वेळ स्वस्थ बसतल; पण कांही काळाने ह्या नोटांची किंमत कमी होऊन त्यांची प्रतिष्ठा राहणार नाही. ह्या कागदी नोटांत मुख्य दोष असा आहे कीं, सोन्याचांदीच्या मानाने त्यांची अस्थिर राहणार; शिशर सोनें व चांदी ह्या धातूंचे महत्त्व सर्व राष्ट्रांत सारखे आहे, ह्या धातूंची नाणी ती जर कृत्रिम नसतील तर, सर्व राष्ट्रांत चालू शकतात; पण कागदी नोटाचे कार्यक्षेत्र ज्या देशांत तेथील सरकारने त्या काढल्या असतील त्या देशांतच मर्यादित असणार.

 पग पेक्षा कागदी नोटांमध्ये असलेला सर्वात मोठा दोष म्हटल म्हणजे हा की, त्या काढण्यांत सरकारास काय किंवा पेढ्यांस काय फारसा खर्च येत नसल्यामुळे व ज्या नोटा काढावयांच्या लाबद्दल नाणें दे- ण्याची सक्ती नसल्यामुळे त्या वाजवीहून जास्त प्रगति काढण्याचा मोह सरकारास व पेढ्यांस आवरत नाही, व गरीब लोकांचे नाइक नुकसान होतें.. ज्या देशांत पूर्वी धतुचें नाणें प्रचरांत आहे अशा देशांत नेटांचा प्रसार कर ण्यास सरकारनें आरंभ केला म्हणजे पहिला परिणाम असा होतो कीं, प्रेशामध्य नियमःचा प्रभाव दिसूं लागतो व नाणी अड होऊं लातात. मात्र एक गोष्ठ आपण गृहीत धरली पाहिजे कीं, लोकांना ह्या चलनी नोटांची व्यापार वगैरे करितां जरूरी नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे लोकांना जर खरोखर जरूरी असेल तर ह्या नोटा घातूच्या नश्याच्या मानानें ईणकस असल्या तरी धातूचा