(२५१ ) सई झालेच समजावें. जगाच्या अनुमवावरून असे ठरते की, मनुष्याइतका झोडगा प्राणी दुसरा नाहीं. हाडू ह्मटले, तर कुत्रे दूर होते. एकदा अठवणीजागा ठौला बसला तर पुन्हा त्या जागी जात नाही. ' पण सज्ञान म्हणणारा द्विपद् पशु पंचविषय बाधेनें घेरला, म्हणजे किती मानहानि, धनहाने आणि सुरुतहानि झाली, तरी आवडत्या विषयापासून दूर होत नाहीं. मुरलेला विषयलोभ. * अगं गलित पलितं मुड दशनाविहीनं जातं तुडे ।' अशी स्थिती प्राप्त होऊन हा प्रपंच नको, नको, असे मान हालून सांगू लागली; प्रपंचाच्या दुःखाच्या कहाणीस कंटाळून कानांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला; हा संसार दृ. हीस नको, ह्मणून नेत्रांनी आपला धर्म सोडला. तात्पर्य, इंद्रियें विषयांस कंटाळून ते सेवण्यास मसमर्थ झाली, तरी साठ वर्षे गेल्यावर सुद्धों विषयवासना अजरामर राहिल्याकारणाने प्रपंचातील दुर्दशा एकदा नाहीं शंभरदा वाकांडी बसली, तरी बायको मेली म्हणून धायधाय रडुन लागिराच्या ( लग्नाच्या ) लाथांनी तृप्त न होता, दुसरा समंध जोडण्यासही कांहीं शहाणे तयार होतात ! हर हर ! संग मुरलेला विषयलोभ परम दुरत्यय खरा ।। देहावरचा लोभ अनिवार. कांहीं दुखण्यापण्याच्या यातना घटकाभर झाल्या, तर मनुष्य अगदी विव्हल होऊन देवा, मरण येईल तर बरे होईल, असे म्हणून जाते; परंतु पर: स्वाधीन होऊन साजे आणि शौच रोज डाक्टराने बळे करवावा, लोकांनी उचलून बिछान्यावर ठेवावे, ह्या कुशीचे त्या कुशीवर सुद्व दुस-याच्या मदतीयांचून होतां येऊं नये, अशी प्रत्यक्ष मरणापेक्षां परम कठीण स्थिति झाल्यावर सुद्धा वर्षानुवर्षे जगलेली माणसे आणखी वाचण्याकरितां पाण्याप्रमाणे पैसा खर्च करून यत्न करितात ! असा ह्या देहावरील लोम मनिवार आहे. एवंच सगळे लोक संसार करितात ह्मणून त्यात सुख असेल ही भ्रति व्यर्थ आहे. 'संसार सोडणारांची दशा. संसार दुःसमय आहे, निवृत्ति मार्ग फार खडतर माहे, दोहींकडे अडचण तर सरीच, परतु चौगले तितके कष्ट साध्य असावयाचेच. चांगल्याकरिता