( १५५ ) शिते तोंवर भुते जमलेली. जरा सुखाला का अंतर पडलें कीं चाळळी निघून; पण ह्यांचा मानभावी कावा उगीच लक्षात घ्या. कोणी गृहस्थ आसन्न मरण झाला म्हणजे मार्यचे गोंधळ ( भाऊबंद, आप्तसोयरे, इष्टमित्र ) त्याच्या अंथरुणामोंवताली जमतात, माण मोठमोठाले दुःखोद्गार काढून म्हणू लागतात की छाय करावें बवा मोझे असते तर वांटन तरी घेता येते! पण येथे कोणाचा काय इलाज आहे!' हे उद्गार ऐकून व्यवहारातील बतावण्या माहीत नसणान्या शुद्ध आणि कोवळ्या मनाच्या माणसाला मोठा चमत्कार वाटतो. संकटसिंधु पार पाडण्यास हे गोंधळी नौकाच होतील असा मोठा भरंवसा वाटतो. पण तो आसन्नमरण मनुष्य चाटेस लागून त्याची पोरकी पोरे, नवी तरणी बायको, आणि जरामस्त मातापितरे उघडी पडून त्यांस मरण पावलेल्या मनुष्याच्या कर्जाची बच लागू लागल्याकारणाने घरदार जाण्याची वेळ माली झणजे हे गोंधळी सुसंपन्न असले तरी त्या निराश्रिताकडे ढुंकूनही पहात नाहीत, कोरडा दिलदिलासा देखील करीत नाहीत, किंवा सल्लामसलत सुद्धा देत नाहीत. सल्लामसलत देण्यास जावे तर एखादे आपल्याच गळ्यात पडेल असे वाटून दूरदूरच रहातात. ** ह्या बोटाची कळ त्या बोटास नाही ? हेच खरे. काहीं नीच तर मढ्यावरील लोणी खाण्याचीहि वाट पहात असतात. सर्व सुखाचे संगति. में कार्यं वगैरे सुखाचे मणि थाटमाटाचे, व मिष्टान्नाचे समारंम असले झणजे ह्या गोंधळ्यांच्या गर्दीस पूर येतो. बादरायणसंबंधाचे नातेवाईक आणि ६ रोजगजपालकः तस्य शालकस्य शालकस्य शाळकस्य शालकः ॥' या मासल्याचे बड़े लोक सुखाखातर आपोआप जमतात, किंबहुना आपला डामडौल दाखविण्याकरिता व मापली फुशारकी मिरविण्याकरिता कार्य करणारा बळेच हा गोतावळा जमा करितो; पण " व-हाड नोहे वर हाड आलें । हे त्यास लवछर छळत नाहीं, विघ्नाच्या प्रसंग मात्र ज्याचा तो. * कठिण समय येतो कोण कामास येतो " ह्या ह्मणण्याचा प्रत्यय येतो. सारांश सर्व मोबदल्याच्या गोष्टी आहेत. * दाम करी काम या न्यायाने सुर्तीच्या भिडेने जमविलेले नोकरचाकर, इष्टमित्र, चाहते, प्रियकर ह्यांत माणि ह्या मायेच्या गोंधळाने