पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_A > वनविकास मंडळे-सलीम अलींच्या व इंदिरा गांधींच्या शब्दात- वनविनाश मंडळे बनून वैविध्यसंपन्न, नैसर्गिक जंगल मोठ्या प्रमाणात तोडले गेले. • देवरायांसारखा जैवविविधतेचा ठेवा अनेक बतावण्यांनी वनविभागाने नष्ट करण्यात मोठी भूमिका बजावली. > लोकांना वैरी बनवल्याने त्यांच्या पाठिंब्याविना वीरप्पनसारख्या तस्कराला पकडण्यात १५-२० वर्षे अपयशी राहून त्याच्या टोळीमार्फत सर्व चांगले वाढलेले चंदन व सुळेवाले हत्ती-साच्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळातले -नष्ट झाले. > सरिश्कासारख्या भरपूर पैसे, साधन-संपत्तीने समृद्ध व्याघ्रप्रकल्पातून सारे वाघ मारले गेले तरी ते प्रत्यक्षात थांबवले नाही, केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत खोटे सांगत राहिले. > लोकपराङ्मुख भूमिकेमुळे भरतपूरच्या सरोवरासारख्या अनेक स्थळांची दुर्दशा झाली. याउलट, लोकांना जबाबदारीने काहीही करणे अशक्य होईल, त्यांचे संघटन कमकुवत होईल, त्यांना दिलेली आश्वासने अजिबात पाळली जाणार नाहीत, त्यांना भ्रष्टाचारात सहभागी केले जाईल अशी परिस्थिती असूनहीः > देशभर अजूनही वड-पिंपळ-उंबर ही परिसराच्या दृष्टीची कळीची संसाधने तगून आहेत. अजूनही थोड्या-बहुत देवरायांत कुन्स्टलरिया केरळेन्सिस सारख्या नव्या वनस्पति प्रजाति सापडत आहेत. देशातल्या अनेक भागात माकडे-वानरे-मोर बागडत आहेत. काळवीट-चिंकारा–विशेषतः नीलगायींची संख्या अनेक ठिकाणी वाढली आहे. चिंकारा-काळवीटांची चोरटी तस्करी पकडून देण्यात स्थानिक लोक पुढाकार घेत आहेत. | राजस्थानात अनेक भागांत लोक “ओरण” जंगले संभाळून आहेत नागालँडमध्ये स्थानिक समाज निसर्गरक्षणात पुढाकार घेत आहेत. उत्तराखंडातल्या बनपंचायती अनेक ठिकाणी चांगले काम करत आहेत. पूर्वीचे निस्तार हक्क असलेल्या मध्य भारतातील अनेक भागांत लोक जंगल संभाळून आहेत. > गडचिरोली जिल्ह्यातील परंपरागत निस्तार हक्क असलेली जंगले अजूनही मेंढा-लेखा व अन्य अनेक गावांनी राखलेली आहेत. | A A AA _A_A_A_A _A