खांचेतील बंदिवान जितके खरोखर सुटतात तितके या
कल्पित मोकळिकेत आलेल्या पैकीं सुटत नाहींत.
ह्या बागांतील कैदी सर्व स्वकर्माभिमानी आहेत. सभ्य-
ता, उद्योगशीलता, प्रामाणिकपणा व नेमस्तपणा यांकडून
आपले तारण होत नाहीं अशी त्यांची खातरी झालेली अ-
सते. आपल्यास अणखी कांहीं पुण्य असावे अशी इच्छा त्यांस
उप्तन्न होते, पण सैतान त्यांस सांगतो कीं, पश्चात्ताप करा, प्रा-
धंना करा, माळ जपा, उपास करा, व्रतें पाळा, दानधर्म
करा, शास्त्र पठण करा, तीर्थ यात्रा करा, देह दंडन करा,
कांदे, वांगी, मांस, इ० अभक्षभक्षण सोडा; जातीभेद कड-
कडीत पाळा, गोत्राह्मणसेवा करा, पुराणकीर्त्तन श्रवण करा,
गोसावी, सन्याशी व्हा, वनवासी व्हा, वेदांतविचार करा,
ह्मणजे तुझी धार्मिक व्हाल. ह्या सूचनेप्रमाणे ते वतूं
लागतात; परंतु ते फसतात. सैतान त्यांस त्या बागाच्या
बाहेर जाऊं देत नाहीं.
आतां ज्यांस सैतानाने मोठ्या खोल व अंधाराच्या खां-
चेत कोंडून ठेविले आहे, त्याकडे आपण क्षणभर पाहूं. अशा
कैद्यांची संख्या फार मोठी आहे. ते नाना प्रकारच्या विषय-
वासनांचे गुलाम आहेत. त्यांच्यामध्ये अनेक दुर्गुण आहेत,