" ज्यांची मुलगी आजारी होतो व ज्यांनी समुद्रकाठी बदली मागितली होती, त्यांचीच का तू मुलगी ? "
" होय महाराज."
" त्या तुरुंगात कोण आहे ?"
" ते एक राजकीय कैदी आहेत. त्यांना फुलांचे वेड ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या सांगण्यावरून हा प्रयोग मी केला. ते सारे श्रेय त्यांचे आहे. मी निमित्तमात्र. "
" राजधानीच्या तुरुंगातून तो कैदी अन्यत्र पाठवताच तू आजारी
पडलीस. होय ना ? "
" होय."
" काय होत होते तुला, बेटा ? "
" तसे काही नाही. मी काय सांगू महाराज ?"
" प्रेमाच्या पिशाचाची बाधा तर नव्हती ?"
" आपण सर्वज्ञ आहात."
" बरे, जा. उद्या प्रदर्शन- मंडपात माझ्या शेजारो बैस आणि हे कपडे उद्या काढ. नवीन सुंदर पोषाख तुला देण्यात येईल तो घाल आणि दोन सुंदर दागिने देईन ते अंगावर घाल. समजलीस ना ? जा. बेटा काळजी नको करू."
कळीची कळो फुलली. ती निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. हजारो लोक येत होते. खेड्या-पाड्यांतून, शहरा-शहरांतून स्त्री-पुरुषांच्या झुंडी येत होत्या. तिसरे प्रहरी बक्षीससमारंभ होणार होता. मंडप कधीच भरून गेला. सुंदर व्यासपीठ केलेले होते. तेथे छताखाली ती कुंडी ठेवण्यात -आलो होती. अनुपम सौंदर्याने युक्त असे ते फूल तेथे डोलत होते. राजासाठी चांदी-सोन्याचे सिंहासन होते. त्याच्या दोन बाजूंस अनेक सुंदर आसने मांडण्यात आली होती.
राजाने काही शिपायांस बोलावले. “ जा, ताबडतोब त्या समुद्र काठच्या तुरुंगातील त्या राजकीय कैद्यास घेऊन या. चांगले घोडे गाडीला जुंपा. सायंकाळपर्यंत येथे आले पाहिजे. " शिपाई ' आज्ञा' असे म्हणून गेले. वेगवान घोड्यांची गाडी घेऊन ते गेले. तुरुंगासमोर गाडी थांबली.राजाचा निरोप ढब्बूसाहेबांस सांगण्यात आला. शृंखला घातलेला फुला
४६ * फुलाचा प्रयोग