“ अर्ज करून बघतो. परंतु तू खात जा, पीत जा. कळ्ये, तू दुःखी
असलीस म्हणजे मला मग काही सुचत नाही. तू आनंदी राहा."
" मी का मुद्दाम दुःखी असते बाबा ? खोटे-खोटे हसू किती वेळ
'टिकणार ? खोटे हसणे, खोटे रडणे म्हणजे अळवावरचे पाणी. "
ढब्बूसाहेबाने कोठे तरी समुद्रकाठच्या तुरुंगावर बदली व्हावी, मलगी
आजारी आहे, तिला तेथे बरे वाटेल, असे लिहून अर्ज केला. अर्ज राजाकडे
गेला. राजाने विचार केला, फुला प्रथम ह्याच अधिकाऱ्याच्या ताब्यात
होता. फुला ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगावर ह्याची बदली केली तर बरे
होईल असे राजाला वाटले. शेवटी ढब्बूची बदली झाली. त्या समुद्र-
काठच्या तुरुंगाचा अधिकारी म्हणून तो गेला. कळीही अर्थात् तेथे गेली.
ढब्बूसाहेब तुरुंगाची पाहाणी करीत होते. पाहाता-पाहाता फुलाच्या
कोठडीजवळ ते आले. तेथे फुला होता. तो उभा होता. बागेतील फुलाकडे
बघत होता.
" काय ठीक आहे ना ? फाशीतून वाचलेत. आता नीट वागा. तुरुंगाची
शिस्त पाळा. मी मोठा कडवा आहे. शिस्त पाळणाऱ्याला मी चांगला
आहे. शिस्तभंग करणाऱ्याला मी वाईट आहे. " ढब्बूसाहेब म्हणाले.
ढब्बूसाहेब निघून गेले. फुला पाहात होता. त्याला आनंद झाला होता.
कळीही आली असेल. ती येईल, ती भेटेल, ती बोलेल. फुलाने खोलीत
उड्या मारल्या. खिडकीतून भरती आलेला समुद्र त्याने पाहिला. त्याच्याही
मनात सुखकारक कल्पनांच्या लाटा उसळत होत्या. आनंदाला भरती
आली होती.
दुपारची एक-दोन वाजण्याची वेळ होती. ढब्बूसाहेबांची ती वामकुक्षीची
वेळ. पिता निजला आहे असे पाहून कळी उठली. ती एकदम फुलासमोर
येऊन उभी राहिली, दोघे हसली, आनंदली. तिने गजांतून आपले हात
आत घातले. त्याने ते धरले. तो तिच्या हातावर बोटाने लिहू लागला.
काय लिहीत होता ? " समजले का काय लिहिले ते ? " त्याने विचारले.
“ हो. " ती म्हणाली. “काय लिहिले ते सांग."
" माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे ना लिहिलेत ?" "नाही काही."
" मग काय लिहिलेत ?"
समुद्रकाठच्या तुरुंगात ३१