पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(२) दीन-दुबळ्यांची मानवसेवा. त्यात वैद्यकीय, शिक्षण, समाजोद्धार यांचा अंतर्भाव होतो. ख्रिस्ती मिशनरी कार्याचा प्रारंभ येशू ख्रिस्तापासून झाल्याचे मानले जाते. त्याचे कार्य इस्त्रायलपुरते मर्यादित होते. पण, त्याने शेवटची शिकवण दिली, ती होती, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांनी हा आदेश तंतोतंत पाळला व ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर झाला. त्यात सेंट पॉलचा सिंहाचा वाटा मानला जातो. फिलिप, बॉर्नाबस, मार्क अपोलो, मत्तय, लुक, योहान, सिलास प्रभृती आरंभीचे मिशनरी होत. त्यामुळे आशिया व युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.
 भारतात आलेला येशूचा पहिला शिष्य ख्रिश्चन मिशनरी होता. सेंट थॉमस (थोमा). तो केरळमध्ये आला. त्याने तिथे सात चर्चेस उभी केली. अठराव्या शतकात आलेले रेव्ह. विल्यम कॅरी हे भारतातील आधुनिक मिशनरी कार्याचे जनक मानले जातात. ते बंगालमध्ये आले व त्यांनी धर्मप्रसार केला. महाराष्ट्रात मुंबई, अहमदनगर, वसईबरोबर दुर्गम भागात जाऊन खेडी, जंगल, डोंगर, दच्या ओलांडून जिथे विकासाच्या पाऊलखुणा उमटणे अशक्य, अशा ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी जात व तिथल्या लोकांची सेवा करत. हरिजन, आदिवासी, कोळी इ. वस्त्या त्या काळात माणूस म्हणून समाजाच्या खिजगणतीत नव्हत्या. समाजात अस्पृश्यता होती. जातीय उच्चनीचता, आर्थिक विषमता, धर्ममार्तंडांचे प्राबल्य, सावकारी पाश, प्रस्थापितांची शिरजोरी यामध्ये दीनदुबळ्या वर्गास कोणतेच स्थान नव्हते. विकासाचे पहिले हक्कदार असणारा हा वर्ग गावकुसाबाहेर उपेक्षित जिणे जगायचा. ख्रिश्चन मिशनच्यांनी त्यांना आपलेसे केले. सेवा, शिक्षण, आरोग्य, धर्म इ. माध्यमांतून त्याचे जीवनमान उंचावून, त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात 'माणूस' म्हणून प्रतिष्ठित केले.

  महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मिशनरी आले. त्यापैकी रेव्ह. डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड होते. ते मूळचे अमेरिकेतील. त्यांचे वडीलही धर्मप्रसारक होते. धर्मप्रचारकाचे शिक्षण, प्रशिक्षण व विविध देशांतील कार्यानुभव घेऊन, ते प्रेस्बिटेरियन मिशनमार्फत सन १९०७ मध्ये भारतात आले. प्रारंभी मिरज-सांगली परिसरात येऊन त्यांनी येथील लोकजीवन, भाषा, संस्कृतीचा अभ्यास केला. ते मराठी शिकले. त्या काळी मराठी मोडी लिपीत लिहिली जायची. ती लिपी त्यांनी अवगत केली व नंतर ते कोडोली (ता. पन्हाळा) येथे तत्कालीन कोल्हापूर संस्थानच्या अखत्यारीत असलेल्या भागात एका शाळेचे प्राचार्य म्हणून

प्रशस्ती/७५