पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांभीर्याने वाचून त्यावर चिंतन, मनन करून कृती करायला हवी. आयुष्याचे सहस्त्र चंद्र पाहिलेला हा शिक्षण योगी, त्यांचे हे विचार केवळ शब्दांचे फुगे नि बुडबुडे नाहीत. त्यांना मोत्याचे पाणीदार तेज आहे ते त्यांच्या समाजलक्ष्यी कर्तव्यदक्ष पालकाचे. म्हणून त्यांचे लेखन वाचून सोडता येत नाही ते तुम्हास विचारप्रवण करत, अंतर्मुख करत आचारधर्मी बनवते, म्हणून या लेखनाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व आहे.

 ‘शैक्षणिक विचार (भाग - ४)' ग्रंथात एकूण ३५ विचारपूरक लेख आहेत. ते शिक्षण, संस्कार, सामाजिक प्रश्न व समस्या, व्यक्तिलेख, क्रीडा, जात वास्तव, व्यसन, व्यवसाय शिक्षण, मानवसेवा, स्त्री-जीवन, शेती, राष्ट्रीय एकात्मता अशा बहुपेडी विषयांना वाहिलेले आहे. ग्रंथातील विषय वैविध्य लेखकाच्या समाजभानाचे व्यापक क्षितिज स्पष्ट करते. डी. बी. पाटील सर रोजच्या घडणाच्या घटनांकडे प्रेक्षक म्हणून पाहात नाहीत. त्यांना सतत समाजाची चिंता असते. विशेषतः रोज घडणाच्या छोट्यामोठ्या घटनांचे विद्यार्थ्यांवर होणा-या संभाव्य परिणाम, दुष्परिणामांबद्दल ते जागरूक असतात तसेच चिंतितही. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या समग्र लेखनात आढळते. ते चांगले वाचक आहेत. त्यांचे वाचन चतुरस्त्र आहे. आपल्या लेखनापूर्वी ते स्वाध्याय करतात. संदर्भ जुळवणी, सांख्यिकी माहितीचे संकलन यांच्या आधारावर ते आपली मते बनवत असल्याने त्यांच्या लेखनाचा पाया मजबूत असतो. ते शिक्षण, समाज, माणूस असा । त्रिविध गोफ गुंफत लेखनाची वीण ठरवत असल्याने सदर लेखन वाचकास । भावते व त्याच्या हृदयास भिडतेही. वॉल्ट व्हिटमनचे श्रेष्ठ लेखनासंबंधी एक जगप्रसिद्ध वाक्य आहे - 'Who touches the book, thouches the man' साहित्य हा हितवर्धक उपक्रम असल्याने तो मनुष्यलक्ष्यी असतो. हृदयस्पर्शी लेखन लेखकाच्या हातून तेव्हाच घडते, जेव्हा लेखक त्या विषयाच्या मुळाशी, गाभ्याशी पोहोचतो. लेखनाचा गाभा घटक विद्यार्थी हा डी. बी. पाटील यांच्या जीवनाचा नर्मबिंदू (weak point) आहे. त्याचा प्रत्यय या ग्रंथातील शब्दागणिक येतो.
 'शैक्षणिक विचार (भाग ४)' मधील लेखाच्या लेखनामागे एक लेखन सूत्र असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमशिबिराच्या निमिताने विद्यार्थ्यांना संबोधन करण्याच्च्या उद्देशाने त्यांनी केलेले भाषण त्याचे लिखित रूप म्हणजे ग्रंथातील पहिला लेख. Not me,but you' हे या योजनेचे ब्रीद. ब्रीद हे उद्देश स्पष्ट करणारे विधान होय . डी .बी .पाटील सरांनी या योजनेची सर्वकष माहिती घेऊन हा लेख लिहिला असल्याने वाचन ज्ञान

प्रशस्ती/२१०