एकदा म्हणाले होते की ‘लेखक काही अक्षर सुधारण्यासाठी लिहीत नसतो'. तुमच्या लेखनात भाषा, शिल्प, शैली, प्रयोग, भाष्य, निरीक्षण यांची नवीनता आणि वैविध्य नसेल तर मग ते लेखन अक्षर सुधारण्यासाठी केलेला कित्ता होऊन जातं. आपलं लेखन गिरवणंच ठरणार असेल तर विद्यार्थी व लेखकात फरक तो काय उरला?
कथासंग्रहाचं शीर्षक असलेली ‘कष्टाचं चीज' एक सामान्य बोधकथा आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' ची उक्ती सार्थ करणारी कथा. लेखकाने ती इतिवृत्तात्मक शैलीत लिहिली आहे. नायक सहदेव कष्टातून मोठा होतो व मोठा झाल्यावर मोठे कष्ट करून सुखी संसार करतो. कॅन्सरने मेलेल्या आपल्या आईची स्वप्नातली शिकवण प्रमाण मानून तो जीवन कंठतो व सुखी होतो. चोरीच्या तपासाची दिशा' ही म्हैस चोरीवर आधारलेली आहे. जनावर मुकं असलं तरी त्याला माया कळते हे समजावणाच्या कथेत चोरीला गेलेली रखमाची म्हैस फौजदार शोधून ज्याची त्याला देतो. भूतदया हे या कथेचं सूत्र म्हणून सांगता येईल. ‘पुनर्जन्म' ही डॉक्टरांच्या सेवाभावी उपचाराचे मोल वेड्या माणसास । शहाणे करते असं आश्वासक सत्य रुजवणारी कथा. कथानायक संजय व्याधिग्रस्त होऊन मनोरुग्ण होतो व एके दिवशी परागंदा होतो. वेडात तो पोहोचतो तमिळनाडूत. दशकभरानंतर तो गावात सुजाण माणूस म्हणून परततो. त्याच्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. ही किमया असते डॉक्टरांच्या सेवेची. तशीच ती मनोरुग्णालयाच्या मानव सेवेची पावती पण असते. आपण शहाणी सुरती माणसं मनोरुग्णालयांसारख्या सेवा केंद्रांची उपेक्षा करतो, म्हणून ती सुमार दर्जाच्या सुविधा घेऊन उभ्या राहिलेल्या असतात. आपण त्या लक्ष्यवेधी केल्या तर अधिक सुविधा संपन्न होऊन उच्च प्रतीची समाज सेवा करू शकतील ही या कथेची खरी शिकवण होय.
'पैज' कथा ग्रामीण भागातील तरुणात असलेल्या ईर्थ्यांच्या विघातक परिणामांचे चित्रण करणारी विषयाच्या दृष्टीने पाहिली तर प्रत्येकारी कथा. कथाबीजात खरं तर प्रचंड नाट्य व रहस्य भरलेलं. पण रंगराव बन्ने यांनी ती सुमार पद्धतीने लिहून त्या चांगल्या कथेचं वांगं केलं. वर मी म्हटल्याप्रमाणे कथाकारात निरीक्षण कौशल्य असूनसुद्धा सादरीकरणाचा, शिल्प, शैलीचा अभ्यास करत नसल्यानं असं होतं. ऐन उमेदीतील पाच तरुण जीवघेणी स्पर्धा करत भुता-खेताशी खेळ करतात व खेळ अंगाशी येतो व खुनाचा ठपका नशिबी लागतो. ‘साडेसाती' ही लेखकाच्या अंधश्रद्धा वृत्तीची निदर्शक कथा. एकविसाव्या शतकात कथा लिहिताना लेखकावर समाजास