पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘कलेक्टर भावे की स्वयंसेवक भावे ?”

 वार्तापत्रात असे चटकदार व खमंग मथळे देत दिनेशनं शैलीदार भाषेत आपलं दुष्काळविषयक वार्तापत्र सजवलं होतं त्यावर वृत्तपत्राचे संपादक बेहद्द खुश झाले होते व ते त्यांनी प्रथम पृष्ठावर छापलं होतं.

 चाऊसशेठ पेपर वाचून खुश झाले होते काहीही प्रयत्न न करावे लागता त्यांना अपेक्षित असणारा परिणाम या वार्तापत्राने घडून यायची शक्यता निर्माण झाली होती.

 इतर वृत्तपत्रांत यासंदर्भात काही यायचे असेल तर आपण आपली जाहीर प्रतिक्रिया स्वतःच लिहून पाठवली पाहिजे, हे चाऊसशेठना माहीत होतं. त्यांनी लगेच प्रतिक्रिया लिहून काढली

 'योगायोगाने मी झुंजार पत्रकार दिनेश सावंत यांच्या सोबत तरळदला गेलो होतो. गुरांची छावणी पाहून वाईट वाटलं. एका गरीब शेतकऱ्याचा बैल देखभाल नीट न झाल्यामुळे मेला हे वाईट झाले; पण याला जबाबदार जिल्हा प्रशासन आहे. जिल्हाधिकारी भावे मनोवृत्तीने संघीय वाटतात. त्यांनी अकारणच जनकल्याण समितीला तीन - तीन गुरांच्या छावण्या दिल्या आहेत. त्यांचे कार्य व्यापारी मध्यमवर्गापुरते सीमित आहे. त्यांना शेतकऱ्यांची सुख - दुःखं, समस्या काय माहीत? हा त्यांचा प्रांत नव्हे. येणारी निवडणूक लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या जवळ जाण्याचा हा एक त्यांचा स्टंट होता, असंच माझं मत झालं आहे; पण त्यांना तो स्टंटही नीट करता आला नाही व त्यात एक बैल दगावला. एका गरीब शेतकऱ्याचं पशुधन नष्ट झालं !

 चाऊसशेठची ही प्रतिक्रिया सर्व वृत्तपत्रांत ठळकपणे प्रसिद्ध झाली आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात अनेक पत्र - उलटसुलट मतांची येत राहिली.

 आठ दिवसांतच सर्व वृत्तपत्रांत एक छोटी बातमी प्रसिद्ध झालीः 'तरळद येथील गुरांची छावणी शेतक-यांनी आपली जनावरे काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे भिडे गुरुजींनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'

  ‘वा चाऊसशेठ ! इस बार आपने जो कर्तब दिखाये हैं, उसका जवाब नहीं...' अलनूर साहेबांनी कडकडून मिठी मारीत चाऊसशेठना बधाई दिली. कारण

पाणी! पाणी!!! / १६८