पान:पाकिस्तानचे संकट.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचकांना विनंति वेळापत्रकाचा वाघोबा मागे लागल्यावर पुस्तक लिहिणे व तें छापून प्रसिद्ध करणे ही कामें फार तापदायक ठरतात. 'पाकिस्तानचे संकट या पुस्तकाचे काम तरी अशा रीतीने तापदायक भासू नये, अशी तीव्र इच्छा. मनांत होती; पण, ती इच्छा सफल होऊ शकली नाही, हा योगायोगच होय ! पुस्तकाची केवळ मुद्रिते पाहून, तयार पुस्तक हाती येण्याआधींच, मला पुण्याबाहेर जावें लागत आहे. तथापि, ठरल्या दिवशी पुस्तकाच्या प्रती वाचकांना मिळतील, असा विश्वास मला वाटत आहे. घाईत काम पुरें करावे लागले असल्यामुळे, मुद्रणाचे दोष टाळण्याच्या बाबतीत अवश्य' तो कांटेकोरपणा मला दाखवितां आला नाही, हे मी कबूल करतो; पण, सर्व परिस्थिति लक्षात घेऊन जे करणे शक्य होतें तें मी मनोभावें केलें आहे, असेंहि समाधान मला वाटत आहे. डॉ. आंबेडकर यांचा ग्रंथ मी गेल्या मार्च महिन्यांत वाचला. या विषयावर आपल्यालाहि कांहीं म्हणता येईल, असे मला तेव्हां वाटले. ते म्हणण्याचा योग गेल्या श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ताने आला. मुंबई, बडोदें, अहमदाबाद वगैरे ठिकाणी मी जी व्याख्याने या विषयावर दिली ती लोकांना आवडली, असें दिसले. तथापि, अनेक कारणांमुळे, विचार पुस्तकरूपाने मांडण्याची मनाची तयारी होईना. शेवटी, नोव्हेंबर १०-१२ च्या सुमारास मनाने. असें ठरविले की, एकदां हे पुस्तक लिहून पुरे करावयाचेंच! तो संकल्प परमेश्वरकृपेनें आज पूरा होत असल्यामुळे, मला स्वाभाविकपणेच संतोष वाटत आहे. माझ्या वृत्तपत्रीय लेखनाचा आपलेपणाने स्वीकार करून महाराष्ट्राने मजवर उपकार केले आहेत. या पुस्तकाचाहि महाराष्ट्र आपलेपणाने स्वीकार करील, असा भरंवसा मला वाटत आहे. पुस्तक लिहिण्याचे काम सुरू असतांना मला अनेकांची मदत झाली. केसरी-मराठा संस्थेच्या ग्रंथालयाचे व्यवस्थापक श्री० दि० वि०काळे यांनी