पान:पाकिस्तानचे संकट.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटी कल्पना व तिचें खंडण पतनंतरच्या काळांत ज्या अहिंदु सत्ता भरतखंडभर बोकाळत गेल्या त्या सर्वांना तोंड देण्याचे काम मराठ्यांना प्रायः एकाकीच करावे लागल्यामुळे, या अफाट कामाच्या मानाने ते अपुरे पडले. सत्तासंपादनाच्या व सत्तारक्षणाच्या कामी जो अनुभव नेहमीच सर्वत्र येतो तो याहि प्रकरणी आल्यामुळे, शेवटी मराठे व शीख यांचा मोड झाला व भारतांतल्या साम्राज्यसत्तेपर्यंत इंग्रजांचे हात पोंचले. जो जास्त जागरूक, तो जास्त हिकमती, ज्याचे शस्त्र पल्लेदार व ज्याचे शास्त्र अद्ययावत् तो सर्वश्रेष्ठ सत्ताधारी बनावयाचा हा स्वयंसिद्ध नियम आहे. चलानामचला भक्ष्याः दंष्ट्रणामप्यदंष्टकाः । - सहस्तानां अहस्ताश्च शूराणां चैव भीरवः ।। या जुन्या श्लोकांत ग्रथित केलेल्या अनुभवाचे देशकालानुरूप में परिणत स्वरूप होणे शक्य होतें तें झाल्यामुळेच, इंग्रज या देशांत सत्ताधीश बनले. या सर्व गोष्टी वास्तविक अशाच असल्या तरी, 'आमच्यापूर्वी साम्राज्यसत्ता मोगलांची होती' ही इतिहासविरुद्ध कल्पना पिकविण्याचे इंग्रजांना कारण नाहीं; स्वार्थांध राज्यकर्त्यांनी पिकविलेल्या या कल्पनेवर मुसलमानांनी भाळून जाण्याचे कारण नाहीं; आणि, असल्या कुत्सित पण सोइस्कर कल्पनांमुळे चढून गेलेले मुसलमान देशाचे अखंडत्व खंडित करूं पाहात असतील तर, त्यांच्या त्या दुराग्रहापुढे इतरांनी दबून जाण्याचे तर कांहींच कारण नाही! " दीर्घकाळपर्यंत हिंदुस्थानांत साम्राज्यसत्ता उपभोगणारे आम्ही मुसलमान; कांही झाले तरी हिंदूंचा पगडा आम्ही मान्य करणार नाही; पुढच्या सगळया कटकटी टळाव्या असें हिंदूंना व ब्रिटिशांना वाटत असेल तर त्यांनी बऱ्या बोलाने आम्ही मागत असलेला सवता सुभा मान्य करावा,' या मागणीच्या पोटांत दडून बसलेली भावना किती खोटी व इतिहासविसंगत आहे हे बुद्धीला पटण्याच्या दृष्टीने आतापर्यंत केलेले ऐतिहासिक घटनांचें धांवतें परीक्षण पुरेसे आहे. ही मागणी निराधार व अनैतिहासिक असूनहि मुसलमान ती तशीच दामटीत आहेत यालाहि एक कारण आहे. आचरटपणाच्या कांहींहि मागण्या मागत राहिल्याने वाजवीपेक्षां बऱ्याच अधिक गोष्टी पदरांत