पान:पाकिस्तानचे संकट.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०५. काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री आक्षेपाला उत्तर देणे मुळीच अवघड नाही. काँग्रेसनें जें केले त्याचा तरी अर्थ याहून वेगळा होतो कोठे? मुंबई प्रांतांत काँग्रेसनें बॅ० नूरी यांच्या खेरीज जे मंत्रि निवडले ते सर्वसामान्य मतदारसंघातर्फे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले लोक होते. स्वतंत्र म्हणून निवडून आलेल्या नूरीचा मंत्रिमंडळांत समावेश करावा लागला याचाच अर्थ असा की, सर्वसामान्य मतदारसंघाबाहेर काँग्रेसला मान्यता नव्हती. ___मौलाना अझाद यांनी निवडल्यामुळे आणि मुसलमान असल्याचा जन्मजात गुण अंगी असल्यामुळे, आदल्या दिवशी फैज टोपी घालून आलेले नूरी दुसऱ्या दिवशी मंत्रि झाले आणि मग गांधी टोपी वापरूं लागले! स्वतंत्रपणे निवडून आल्यावर, स्वेच्छेनें गांधी टोपी घालूं लागलेल्या अॅ० चक्रनारायण या ख्रिश्चन गृहस्थांना मंत्रिमंडळांत घेण्यांत आले नाही व या अन्यायाचे शल्य मनाला टोचत राहिल्यामुळे, अॅ० चक्रनारायण यांनी पुढे असेंब्लींतील काँग्रेसपक्षाचा राजीनामा दिला, या गोष्टी सर्वश्रुत आहेत. __अशा रीतीने मुस्लीम मंत्रि घेऊन, काँग्रेसने आपला देशप्रतिनिधित्वावरचा हक्क गमावला व आपण फक्त सर्वसामान्य मतदारसंघांत समाविष्ट झालेल्याम्हणजेच प्रायः हिं -लोकांचे प्रतिनिधित्व करूं शकतों ही गोष्ट काँग्रेसनें आपल्या वर्तनाने पदरांत घेतली. एकीकडे ही कृति करणारी काँग्रेस इतर सर्व बाबतीत आपला जुना हेका चालवीतच राहिली. हा हेका आजपर्यंत अव्याहतपणे चालूच आहे. हिंदू म्हणून हिंदूंचे काही हितरक्षण होणें अवश्य असेल तर तें कार्य काँग्रेस करू शकणार नाहीं; तें कार्य करण्याची ठेकेदारी आपण घेतली असल्याचे हिंदमहासभा म्हणत असते, असे उद्गार गांधीजींनी 'हरिजन' मध्ये महायुद्धाच्या सुरुवातीनंतरच्या एका लेखांत काढिले होते... गेल्या मे महिन्यांत सप्रू-गांधी पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला व त्यामुळे १६-२-४१ रोजी गांधीजींनी सर तेजबहादुर सप्रू यांना लिहिलेले एक पत्र लोकांपुढे का