पान:पाकिस्तानचे संकट.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन १३७ m - त्यांना असें निश्चित म्हणतां आलें असतें कीं, समान नाग रिकत्वाच्या पायावर हिदु, मुसलमान, खिस्ती, पारशी इत्यादि . सर्वांचे राष्ट्र हिंदुस्थानांत निर्माण होतच नसेल तर, राष्ट्र म्हणून .:नांदण्याचा जास्तीत जास्त हक्क हिंदूंनाच पोचतो. ।' पण, डॉ. आंबेडकरांनी असे म्हटले नाही. एकाच मुद्याला जास्त महत्त्व दिल्यामुळे विचाराचे अवधान कसें सुटतें हें डॉ० आंबेडकरांनी या प्रकरणी जे विवेचन केले आहे त्यावरून स्पष्ट दिसते. द्विराष्ट्रवादांतला अत्यंत विचारार्ह मुद्दा कोणता याचे उत्तर त्यांनी (पृ० २९वर) दिले आहे. हिंदु-मुसलमानांना एकत्र बांधणा-या व या दोन्ही समाजांच्या हर्षामर्षाला कारणीभत होणाऱ्या कांहीं ऐतिहासिक गोष्टी आहेत काय, असा प्रश्न डॉ. आंबेडकरांनी (पृ०२९ वर) उपस्थित केला आहे. हिंदु-मुसलमानांमधले ऐतिहासिक काळांतले झगडे विस्ताराने रंगवून (पृ० ३० व पृ० ४९-५९) डॉ० आंबेडकरांनी या प्रश्नाचें नकारार्थी उत्तर दिले आहे. एकत्र नांदण्याची इच्छा हाहि एकराष्ट्रभावनेचा फार मोठा आधार आहे असें दिग्दर्शित केल्यावर, मुसलमानांची हिंदूंच्या बरोबर नांदण्याची इच्छा नाहीं हे सिद्ध करण्यासाठी डॉ. आंबेडकरानी गेल्या वीस वर्षांत देशभर झालेल्या जातीय अत्याचारांची जंत्री विस्ताराने दिली आहे (पृ० १५८-१८३). "१८९५ पासुन पुढे जी जातीय दांडगाई सुरू झाली व जी दांडगाई या क्षणापर्यंत एकसारखी वाढतच आहे तिचा विचार केला म्हणजे, हिदमुसलमान समाजात एकत्र गोवणान्या, दोन्ही समाजांनी ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगावा, दोन्ही समाजांना ज्यांबद्दल उद्वेग वाटावा अशा गोष्टी मुळांत खरोखरच नसाव्या, असे वाटू लागते. पण, खी स्थिति तशी नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या डाक्का शहरांत परवां कल्पनातीत जाळपोळ व हाणमार झाली व हिंदूंचे जीवन असहय झाले त्याच डाक्का शहरातल्या हिंदु-मसलमानांचे संबंध शेसव्वाशे वर्षांपूर्वी किती एकसंध झालेले होते हैं १८३९ साली लिहिण्यांत आलेल्या एका ग्रंथांतील पुढील उताऱ्यावरून लक्षात येईल: Religious quarrels between the Hindus and the Mussalmans are of rare occurrence. These two classes live