पान:पाकिस्तानचे संकट.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी सुमारे २७,७५,००० एवढी संख्या ब्रिटिश भारतांत असून, उरलेली संस्थान हद्दीत आहे. १८८१ ते १९२१ या चाळीस वर्षांत ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत दामदुपटीपेक्षांहि अधिक वाढ झाली आहे. मद्रास इलाख्याच्या अगदी लगत असलेल्या त्रावणकोर व कोचीन या दोन हिंदु संस्थानांत ख्रिस्ती लोकवस्तीचे प्रमाण प्रतिसहस्री अनुक्रमे २९२ व २६८ आहे. मद्रास इलाख्यांत मुसलमान वस्तीचे प्रमाण जेमतेम शेकडा ७ असल्याने त्या भागांत जातीय तेढ नाहीं, तेथें जातीय प्रश्न अस्तित्वातच नाही असें म्हणून, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोंपणाऱ्या स्वप्नाळू लोकांनी हे लक्षांत ठेवावें कीं, पाकिस्तानचा आधार असें जें निजामी राज्य तें दक्षिण भारतांतच आहे. किनाऱ्यालगतच्या मोपल्यांचा उपद्रव हिंदूंना कसा होऊ शकतो हे अलीकडच्या इतिहासांत स्पष्ट झालेले आहे. मोपल्यांचा हा मलबार प्रांत तोड्न मागण्याची स्वप्ने मुसलमानांना पडत आहेत. याच्या जोडीला दक्षिण भारतांत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचारकार्याचे फळ म्हणून ख्रिस्त्यांचे संख्याबळहि वाढते आहे. या सर्व हिंदुबाधक घटनांचा ताप टाळावयाचा कसा या प्रश्नाचा विचार वेळीच झाला नाही तर, वायव्य सरहद्दीवर सिंधुस्तान' हे अलग इस्लामी राज्य निर्माण करण्याचे स्वप्न मुसलमानांना जसे पडू लागले तसेच inter e stinen पुढे मागें नैर्ऋत्य हद्दीवर एखादें सुटसुटीतसें । ख्रिस्तीस्तान' मागण्याचेंहि निस्त्यांच्या मनांत येऊ शकेल. ही पट्टी समुद्रकिनापायाची आहे आणि म्हणून संरक्षण आणि व्यापार या दोन्ही दृष्टींनी 3 ती फार महत्त्वाची आहे हे विसरून चालणार नाही. ___दक्षिण भारतांत निर्माण होणाऱ्या या संभाव्य संकटाची कल्पना शक्य तितकी जास्त स्पष्ट होणें अवश्य आहे. या दृष्टीने या भागांतल्या ख्रिस्ती लोकवस्तीचे १९३१ च्या शिरगणतींतले आंकडेहि अभ्यासार्ह आहेत. या शिरगणतीप्रमाणे हिंदुस्थानांतील ख्रिस्त्यांची एकुणात ६२.५ लक्षांजवळ आहे. १९२१च्या शिरगणतीच्या तुलनेने पाहतां ही संख्यावाढ शेकडा ३२.५ इतकी आहे. यांतली शेकडा २० वाढ धर्मांतरामुळे झालेली आहे.

  • Pakistan by Dr. Rajendra Prasad, pp. 37 and 43. 2