पान:निर्माणपर्व.pdf/158

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कधी नव्हे तो शेतकरी या वेळी जागा झाला होता. त्याच्या घरादाराचे लिलाव झाले होते, त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता. त्याची तरुण मुले शिकलेली होती. स्वस्थ बसायला तयार नव्हती.
 निरनिराळे थर निरनिराळ्या कारणांमुळे असे दुखावले गेलेले होते आणि हा असंतोष विधायक मार्गांनी वेळच्या वेळी प्रकट व्हायला काही साधन उरलेले नव्हते.
 राजकीय पक्षांना वाव नव्हता.
 वृत्तपत्रे बंधनात अडकलेली होती.
 सभांना बंदी होती. मोर्चे निघू शकत नव्हते.
 त्यामुळे असंतोष साचत गेला, दबून राहिला आणि वेळ येताच उफाळून वर आला.
 असंतोषाच्या लहान लहान लाटांचे एका महाप्रचंड लाटेत रूपांतर झाले आणि नगरांमागून नगरे गिळंकृत करीत शेवटी दिल्लीचे सिंहासनही या लाटेने वाहून नेले.
 मानवी संतापाचा एक वडवानल उफाळला होता.
 हा एक ज्वालामुखीचा उद्रेक होता.
 मतभेदांच्या, पक्षोपपक्षांच्या, जाती-धर्माच्या, वर्गीय हितसंबंधांच्या तटबंद्या चा उद्रकामुळे केव्हाच कोसळून पडलेल्या होत्या. लहानमोठा हा भेदभाव विर१ळला होता. स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांच्या घराघरातून तेवणाच्या ज्योतींचे नालात रूपांतर झाले होते. प्रत्येकाच्या हृदयस्थ नारायणाला प्रेरणा मिळाली होती.
 हे सर्व राज्यकर्त्यांना कळलेच नाही. भ्रमात राहिले. नरसिंह प्रकट होतो आहे याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आणीबाणी नसती तर वेळेवर लक्ष तरी देण्याची बुद्धी त्यांना झाली असती. पण आणीबाणीमुळे तळागाळात काय काय घडते आहे चे ज्ञानच राज्यकत्यांपर्यंत पोचू शकत नव्हते. वाफ नको तितकी कोंडली गेली होती. तिचे उफाळून वर येणे क्रमप्राप्तच होते. निवडणुका जाहीर झाल्या म्हणून ती मतपेटीद्वारा उफाळली. नाहीतर आणखी वेगळ्या मार्गांनी बाहेर पडली असती झाले ते उत्तम झाले. मतपेटीद्वारा जगातील एक अभूतपूर्व राज्यक्रांती घडवून खवण्याची एक महासंधी येथील जनतेला त्यामुळे प्राप्त झाली.

 या लोकशाही राज्यक्रांतीचे सादपडसाद आता शेजारीपाजारीही उम

भारतीय मृगेन्द्र । १५७