पान:निर्माणपर्व.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टल्याशिवाय राहणार नाहीत. लंका, ब्रह्मदेश, तसेच पाकिस्तानातील जनताही दडपली गेलेली आहे. तेथील राजवटी अन्यायावर उभ्या आहेत. या सर्व आसपासच्या देशांत असंतोष खदखदतो आहे. परकीय मदत घेऊन आर्थिक अरिष्टे पुढे ढकलण्याची कसरत याही देशांत चालूच आहे. आर्थिक स्वयंपूर्णता, लोकशाही स्वातंत्र्याची जपणूक करून कशी साधावयाची, हा पेच या सर्व आशियायी देशांसमोर उभा आहे. भारतीय मृगेन्द्राची ही जाग, ही गर्जना, हा त्याने साधलेला भीम पराक्रम या आसपासच्या देशांतील जनतेलाही स्फूर्ती दिल्याखेरीज राहणार नाही. शेवटी या उपखंडाचे प्रश्न समान आहेत. श्रीमंत बड्या राष्ट्रांची आर्थिक मांडलिकी सर्वांवरच जुलूम जबरदस्तीने, किंवा मदतीच्या नावाखाली लादली जात आहे. हे सारे अर्धविकसित देश अर्ध मांडलिक अवस्थेत आहेत व भाकरी व स्वातंत्र्य या दोन्हींचीही त्यांना तितकीच निकड आहे. भारतीय मृगेंद्राचे हे इतिहासदत्त कार्य आहे की, त्याने आपल्याबरोबरच आसपासच्या या सर्व लहानमोठ्या देशांनाही हे अथक पारतंत्र्य झुगारून देण्याची, एक स्वयंपूर्ण अर्थरचना खडी करण्याची स्फूर्ती द्यावी. प्राचीनकाळी तर सांस्कृतिकदृष्ट्या हा सर्व भूप्रदेश एकात्मच होता. या सर्व भूभागाला त्यावेळी जंबूद्वीप हे समान नामाभिधान लाभलेले होते. 'जंबुद्वीपे भरतखंडे' हा प्राचीनांचा स्वदेश होता. इंग्रजांनी तो लहान केला. फाळणीमुळे तो आणखी लहान झाला. ही. फाळणीची साम्राज्यसत्तांनी लादलेली प्रक्रिया आता उलटवण्याची, परस्परबंधुभावातून एकत्र येण्याची वेळ जवळ येत चालली आहे. भारतीय मृगेन्द्राची स्वातंत्र्याची, स्वत्वाची घनगर्जना आता चहूदिशांतून घुमली पाहिजे, तिच्यामुळे त्या त्या देशांतील भ्रष्ट, हुकूमशाही राजवटीही कोलमडून पडल्या पाहिजेत. हे महत्कार्य आहे आणि हे साधायचे तर, महत्कार्याचे कंकणही होती बांधायला हवे आहे. हे कंकण न बांधताच इंदिराजी हे साधू पाहत होत्या. म्हणून त्यांना अपयश येत होते. त्यांच्या राजवटीचा आता निरोप घेत असताना भारतीय जनतेने हे कधीही विसरता कामा नये की, मांडलिकत्वाची आत्यंतिक चीड असणारी ही एक प्रखर राष्ट्रवादी व्यक्ती होती. स्वयंपू, समर्थ आणि बलंसंपन्न भारताची उभारणी त्यांनाही अभिप्रेत होती-नव्हे ते त्याच एक स्वप्नही होते. पण केवळ राजकीय कसब दाखवून हे स्वप्न सत्यसृष्टीत उतर वण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी जनमानसात काही खोल नैतिक जाणीवाचा उदय व्हावा लागतो, त्या आधारे काही जनसंघटन सिद्ध व्हावे लागते. याचे त्यांना भानच नव्हते. त्यामुळे बांगला देशच्या युद्धात त्या विजयी होऊ शकल्या. भारताकडे त्यांनी दक्षिण आशियाचे नेतृत्व खेचून आणले. भारतीय उपखंड' हा शब्द प्रयोग नव्याने रूढ झाला. हे सर्व त्यांचे कर्तृत्व होते. पण मुख्य आघाडी आर्थिक होती. तिच्यासाठी काही वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्यबळाचे कंकण हाती बांधणे आवश्यक होते. ही व्रतनिष्ठा त्यांच्या स्वभावात नव्हती. असत्य, आणि

निर्माणपर्व । १५८