पान:निर्माणपर्व.pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
जनविराट


 ‘पुरोगामी सत्यशोधक' या म. फुले प्रतिष्ठानच्या मुखपत्राच्या चालू जकात (डिसेंबर ७६) बाबा आढावांना उद्गीर तालुक्यातील वलांडी गावच्या गंपू शेटीबा बनसोडे या माणसाने पाठवलेले एक पत्र शेवटी दिलेले आहे. त्यात हा बनसोडे लिहितो--

 'सध्या पोटाला मिळणे कठीण झाले आहे. आपण आले वेळेस गवताचे बी तरी खान्यात येत होते ( बरबडा ) ते तरी आपन पाहिले आहे. आता ते देखील नाही. रोज आंबाडीचा पाला आनून सिजउन रानातील काही पाल्याची जा सिजउन थोडं बहुत पीठ मिळाले तर मिसळून मुटके करून खावयाचे असे रोजी आमची चालली आहे--'

 बनसोडेने आणखीही पुष्कळ लिहिले आहे. गावात हरिजनांचा छळ चालू आहे. बनसोडेलाही मार बसला. पूर्वी मदत करणारे फिरले. काम नाही. अन्न नाही. 'आमच्या घरचे सारखे बिमार पडल्यासारखे खंगत व बारीक होत झालेली आहे. मी देखील दोन वर्षात होतो तशे नाही.' तरी--

 आता किती दिवस हा गंपू अशा स्थितीत वलांडीला राहू शकेल?

 बाबा आढाव किंवा अन्य कार्यकर्ते तेथे जाऊन हरिजनांचा छळ थोडा फार थांबवू शकतील. छळ करणा-यांना सरकार शासनही करील. पण गंपूच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटणार?

 एक दिवस काम मागण्यासाठी जवळच्या शहरात, पुढेमागे लांबच्या पुण्यामुंबईतही येऊन तो धडकल्याशिवाय राहणार नाही.

 सुवातीला फुटपाथवर-रस्त्यावर राहील. बसस्टॉपच्या आडोशाला रात्री झोपेल. काम मिळेल त्या दिवशी पाव-मिसळ, भाजी-भाकरी काहीतरी खाईल. पण काहीही झाले तरी वलांडीला, आपल्या गावी तो परत जाणार नाही. उलट शहरातच फुटपाथवरून झोपडपट्टीत शिरण्याचा प्रयत्न करील. हळूहळू घरच्यांनाही

जनविराट । १५१