पान:निर्माणपर्व.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
‘मनु'शासन पर्वाकडे





 कुठल्याही हिंदुत्ववादी व्यक्तीने करावे असे विनोबांचे पंचवीस डिसेंबरचे पवनार येथील मौनसमाप्तीचे भाषण होते.

 या भाषणात राष्ट्रीय ऐक्यावर भर देण्यात आला होता.
 शिस्तीचे महत्त्व गायले गेले होते.
 बळकट केंद्रसतेचा पुरस्कार होता.
 वास्तविक हे सगळे हिंदुत्ववाद्यांचे आग्रह.
 पण काळाने कसा सूड उगवला पहा.

 हिंदुत्ववाद्यांना गांधीजींची नव्याने आठवण झाली आणि गांधीजींच्या मार्गाने आज ते जाऊ पहात आहेत.

 विनोबांसारख्या थोर गांधीनिष्ठाचा प्रवास मात्र उलटा सुरू आहे. इंदिरा गांधींच्या कट्टर राष्ट्रवादी धोरणांना त्यांनी आपला आशीर्वाद दिलेला आहे. ' अनुशासन पर्व ' असे नामकरण करून या धोरणांना एक सांस्कृतिक प्रतिष्ठाही त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे.

 एकचालकानुवर्तित्व ...
 अनुशासनबद्ध समाज...
 आसेतुहिमाचल एकरसपरिपूर्ण भारत ...

 अजून हे श्री. गोळवलकरगुरुजी यांचे प्रत्येक बौद्धिकात, प्रत्येक व्याख्यानात, प्रत्येक बैठकीत हमखास उमटणारे शब्द अनेकांना आठवत असतील. आठवत नसतील त्यांचेसाठी, छापून प्रसिद्ध झालेली त्यांची भाषणांची-मुलाखतींची पुस्तके उपलब्ध आहेत.

 बलाढ्य भारत, युनोच्या आमसभेत वेळ पडली तर क्रुश्चेव्हसारखा जोडा काढण्याची ताकद असणारा भारत, पाकिस्तान तोडणारा भारत, अणुबाँब बाळगणारा भारत, अत्याधुनिक, शक्तिसंपन्न, विज्ञाननिष्ठ भारत'. ही सगळी सावरकरांची स्वप्ने आज कोण वास्तवात उतरवत आहे ?

'मनु'शासन पर्वाकडे । १२५