पान:निर्माणपर्व.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  गांधीजींचा, काही प्रमाणात नेहरूंचाही वारसा मात्र विरोधकांकडे आला आहे.
 सत्याग्रह जोरात सुरू आहेत. तुरुंग अपुरे पडत आहेत.
 इकडे विनोबा मात्र सत्याग्रह अयोग्य म्हणून मोकळे होत आहेत.


 विकेंद्रित समाज, शांती व सहिष्णुता बाळगणारा समाज, अहिंसक समाज, बळाचे प्रदर्शन न करणारा समाज, शहरांकडे, आधुनिक यंत्रतंत्रांकडे पाठ फिरवून स्वयंपूर्ण व स्वयंप्रेरित खेडेगावात राहणारा समाज, शस्त्रशक्तीऐवजी जनशक्तीची पूजा करणारा समाज, प्रेमाची वाढ करणारा, प्रेम देणारा आणि घेणारा, परस्परांशी विश्वासाने सहकार्याने वागणारा समाज... ही सगळी विनोबांची स्वप्नसृष्टी. ही विनोबाप्रणीत सर्वोदयाची जीवनदृष्टी. या जीवनदृष्टीचा मागमूसही जिथे दिसत नाही त्या सत्तावादाच्या उघड्याबोडक्या आणि रणरणत्या माळरानावर विनोबा आज का उभे आहेत ?

 पवनारला परवा कोण सगळे अवतीभोवती होते ? पंचवीस-पंचवीस वर्ष ज्यांनी विनोबांबरोबर भूदानासाठी हाडाची काडे केली, उपासतापास काढले, चिखल तुडवले, काटेकुटे आनंदाने सहन केले, त्यापैकी कितीजण या संमेलनात व्यासपीठावर, विनोबांशेजारी होते ? सगळी गर्दी मंत्रीमहोदयांची–प्रांतोप्रांतीहून आलेल्या. विनोबांनी सहस्त्रमुखांनी सहस्त्रवेळा तरी गौरवलेला तो लोकसेवक, तो सर्वसामान्य भूदानकार्यकर्ता मात्र कुठे तरी अंग चोरून, थंडीत काकडत, खाली मान घालून, दबलेल्या स्थितीत उभा असावा.

भूदानाची, एका स्वयंप्रेरित लोकचळवळीची ही रजतजयंती होती.
पण स्वयंप्रेरणेचा अस्त घडवणा-या राजकारणाला ही जयंती उजळा देऊन गेली.


 आपल्याकडे शेवटी सगळे वाद, तत्त्वज्ञाने व्यक्तिनिष्ठ होतात, त्यांचा स्वरूपे, त्यातील आशय, त्यातील प्रमुख व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे बदलतात हेच खरे.
 गांधीजींच्या सर्वोदयात संघर्षाला स्थान होते. स्वराज्य आल्यावर मला पुंजीपती, बडे जमीनदार यांच्याविरुद्ध झगडावे लागेल, असे गांधीजींनी म्हटले होते.

विनोबांनी पुंजीपतींना, बड्या जमीनदारांना न दुखावता त्यांची संपत्ती,

निर्माणपर्व । १२६ ।