पान:नित्यनेमावली.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ काही येत नाहीं; माझा स्वामी मात्र कृपेसहित हृदयों वसत आहे." असें ते नेहमी म्हणतात. कित्येक लोकांचा असा आक्षेप आहे की, महाराजांस संस्कृत येत नाहीं; भाष्यें, उपनिषदें वगैरे न वाचतां हे साधु कसे असू शकतील ? या अज्ञ लोकांस विद्वत्ता व आत्मज्ञान यांमधील फरक मुळींच कळत नाहीं. वेद कंठरवानें असें सांगत आहे:- द्वे विद्ये इह वेदितव्ये यत्परा चापरा चेति । अपरा यदुग्वेदो यजुर्वेदोऽथर्ववेदः सामवेदः । परा यया तदक्षरमधिगम्यते || " विद्वत्ता व आत्मज्ञान परा व अपरा विद्या, शद्वज्ञान व निःशद्वज्ञान यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. वेदशास्त्रांचें पठण केले म्हणजे आत्मज्ञान होतेंच असें नाहीं; वेदशास्त्राध्यायना- वांचूनही आत्मज्ञान होणें शक्य आहे. "स्थाणुरयं भारहरी वेदानधीत्य न विजानाति योर्थऽम्" । "अनुभूर्ति विना मूढो वृथा ब्रह्मणि मोदते । प्रतिबिंबित शाखाग्रफला- स्वादनमोदवत् || " इत्यादि वेदांतील वाक्येंही केवळ बिद्वत्ता व आत्मज्ञान यांतील फरक दाखवीत आहेत. प्रत्यक्ष अनुभव न मिळवितां केवळ वेदान्त वाचून आपण ब्रह्म झालों अशा कल्पनेनें कित्येक लोक फसून जातात!