पान:नित्यनेमावली.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधु कोणास म्हणावें याबद्दल बहुजनसमाजाच्या फारच चमत्कारिक कल्पना असतात. प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान कोणीच पहात न हींत. जो नानाविध चमत्कार करतो अथवा अप्रबुद्ध बोलत असतो तोच साधु; ज्याचें शरीर वृद्धापकालींहि तेज:पुंज असतें, अथवा ज्याचा शिष्यसमुदाय फार तोंच साधु : ज्यांच्या शिष्यवर्गात पुष्कळ विद्वान व श्रीमंत लोक असतात, अथवा उपनिषदें, भाष्य वगैरेचें ज्यास उत्कृष्ट विवरण करतां येतें त्यासच साधु म्हणावें; अशा अनेक प्रकारच्या कल्पनांनीं जनसमुदायांत काहूर उठविलें आहे. आत्मज्ञानाचा लोप झाला असल्यानें जिकडे तिकडे अज्ञानांध- कार पसरला आहे. या अज्ञानांधकाराचा नाश करण्याचें दिव्य कार्य भाऊराव महाराज करीत आहेत. ते स्वतः चमत्कार करीत नाहीत; पण अनेक चमत्कार आपोआप होतात :- आपण महंती न करिती । परि सर्वत्र चयरकार होती । कां ते पुण्यमार्गे चालती । म्हणोनियां ॥ ज्ञानास सिद्धींचा विटाळ । ऐसें वदती वेळोवेळ | परी तो गोविंद कृपाळ । भक्तकाज करीतसे || पं. स. २-७१, ७२. " शब्दज्ञानानें भुलून जाऊं नका " असें ते नेहमीं सांगत ते असतात. " बाबांनो मी धनगर आहें: मला व्याकरण कोश बर्मरे