Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
बहिष्काराच्या इष्टानिष्टतेच्या मर्यादा.

 परंतु गोखल्यांनी अध्यक्षपदावरून बहिष्कार न्याय्य आहे असें जाहीर केलें तें कां याची कांहींशी कारणमीमांसा जी चिरोल साहेबांनी लाविली आहे ती पहा. ते म्हणतात:-
 "Not even Mr. Gokhale with all his moral and intellectual force could stern the flowing tide of Tilak's popularity in the Deccan; and in order not to be swept under, he was perhaps often compelled like many other Moderates to go further than his own judgment could have approved." ही मीमांसा बरोबर आहे असें आम्हांस वाटत नाहीं. नवीन पक्षाच्या जोरकस प्रवाहांत आपण नाहीसे होऊन जाऊं नये, या हेतूसाठीं कांहीं गोपाळरावांनी बहिष्काराचे समर्थन केलें नाहीं. त्यांना खरोखरच बहिष्कार न्याय्य वाटत होता. फक्त त्याचा उपयोग जेव्हां सर्व राष्ट्रास आग लागली असेल, आणि सर्वांचें ऐक्य असेल तेव्हांच व्हावा, नाहीं तर तें अस्त्र विफल ठरेल असे त्यांचें म्हणणें होतें. असो. एकंदरीत बनारसची काँग्रेस आपल्या गोड व मृदु स्वभावानें गोखल्यांनी नीट पार पाडली हें त्यांस खरोखर भूषणावह झालें. अशा जोमाची व इतकी यशस्वी राष्ट्रीय सभा वीस वर्षांत झाली नव्हती. यंदांच्या काँग्रेसचा विशेष हा होता कीं, मुसलमानांच्या हिताविषयींही सभेनें जागरूकता दर्शविली. हिंदुस्तानांतून यात्रेकरितां बाहेर जाणाऱ्या मुसलमानांवर क्वॉरंटइनचा त्रास- नसती पीडा लादली होती. ही पीडा, हें गाऱ्हाणें दूर केलें जावें अशा अर्थाचा ठराव पास करण्यांत आला.
 १९०५ च्या अखेरीस लॉर्ड मिंटो हे गन्हर्नर जनरल झाले होते. कर्झन व किचनेर यांचा झगडा होऊन, हा तेजस्वी व घमंडानंदन गव्हरनर जनरल एकदांचा निघून गेला. सर्वांचा तळतळाट आपल्या डोक्यावर त्याने घेतला होता. त्याच्यावर लोक दांतओठ खात होते. त्यास शिव्याशाप देत होते. सर्वत्र असंतोषाच्या प्रचंड लाटा आदळत होत्या आणि सर्व देश हादरून गेला होता. हिंदुस्तानचा शनि कर्झन जरी निघून गेला तरी येथील संताप थोडाच शमणार? आग लावणारा जरी गेला, तरी आग थोडीच विझणार? सर्प पळाला तरी त्यानें मनमुराद