पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वल्लरीची भरारी


 सन १९७० चा सुमार. भालचंद्र करमरकर आणि विद्या करमरकर यांचा विवाह होतो. ते आपलं वैवाहिक जीवन सुरू करतात. अगदी तुमच्या माझ्यासारखं... खरं तर सर्वसामान्यांसारखं... विद्याताई काही दिवसांनी आपल्या बहिणीकडे ठाण्याला येतात... एका मुलीला जन्म देतात... वल्लरी नाव ठेवतात तिचं मोठ्या हौसेनं!.. मग पवईला भावाकडे मुक्काम हलवतात... वल्लरी गोरीपान... सुंदर पाणीदार डोळे... चेह-यावर तेज... दृष्ट लागावी अशी! जन्माच्या वेळी झालेला त्रास... सिझेरियन... काळवंडलेलं बाळ... त्याचं सूतभर चिन्हही आता उरलेलं नव्हतं... घरी सर्वत्र बाळाचा कोण आनंद उत्सव! कौतुक!! ... कुणी गोविंद घ्या! कुणी गोपाळ!!
 अन् लक्षात आलं की, वल्लरीची टाळू नाही भरलेली... उपचार करताच सांगलीचं घर गाठलं... डॉक्टरांना दाखवलं... त्यांनी निदान केलं... रडत नाही, गिळत नाही, वळत नाही... हालचाल नाही म्हणजे ती सेलेब्रल पाल्सी आहे. बहुविकलांग आहे. ऐकताच आई-बाबा, आत्या सारे जण पटकन खाली बसले.. अवसान पुरतं गळून पडलं; पण काही दिवसच! ते ठरवतात... डॉक्टर म्हणतात ना तिला हे येणार नाही... ते येणार नाही... ते ते सारं येईल असं पाहायचं... प्रयत्न करायचे... ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हे म्हणणं सोपं असलं तरी करणं महाकर्मकठीण... जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!

 वल्लरी चार वर्षांची झाली तरी बसू शकत नव्हती... चालायची,

दुःखहरण/६०