खात नाही. त्याचं म्हणून काही म्हणणं... घोर असतो. आपण माणसाला कालच्या मोजपट्ट्या लावून आज मोजतो... कसं होणार?
हेच पाहा ना, मी मुलीला आणलं... शिकवलं तर तिचा नवरा व्यसनी निघाला. मी फारकत घेऊन तिच्या मुलीसह... नातीसह तिला सांभाळलं... समजून घेतलं. तिच्या नव-याला पण सुधारायची संधी दिली... त्याला पण काही काळ सांभाळलं; पण सुधारायचं नाव नाही. त्याच्यात एक न सुधारणाच्या पुरुषाचा पीळ आहे... जळल्याशिवाय नव्हे जळल्यावरही तो सुटणार नाही, याची खात्री झाल्यावर मी नाद सोडला. पोरीला मुक्त विद्यापीठात शिकवलं. ती पदवीधर होईल. नात चौथीत आहे. पोरीला मी माझ्या जागी लावीन म्हणते... तिनं माझा वनवास स्वर्ग झालेला पाहिला आहे... चांगल्या अर्थानं ती माझ्यावर गेली आहे. संस्थेतल्या मुलीमहिलांचं ताईंचं शिकून मी जसं करते तसं ती करेल, याची मला खात्री आहे. वातीला वात लागते म्हणतात. वात लागली आहे... वाताहत होणार नाही याची खात्री आहे; कारण तिनं उभारीतच भरपूर उद्ध्वस्तपण अनुभवलं आहे. आमचं निराळं जग म्हणाल, तर उफराटं असतं. इथं समाजाच्या दृष्टींन वंगाळ माणसं असतात; पण खरं सांगू... इथं धोका नसतो... नारायणसारखे धोकेबाज, मतलबी नसतात. इथे आपले परके होण्याची शक्यता नसते... इथे काखा वर करणं नसतं... इथं मी निराळे जग कवेत घेतलं. इथं कवटाळताना कोणी कंटाळत नाही; कारण कवटाळण्यातूनच इथे एकमेक एकमेकांचे कोणीतरी होतात ते जन्मभर! अन् जन्मोजन्मीचे!
पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/101
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुःखहरण/१००
