पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना 'दिलासा' त आणले त्या या
लेखांमधून शैलाताईंनी मांडलेल्या आहेत.
 महाराष्ट्रात वीस-तीसच्या दशकात स्त्रीप्रश्नांविषयीची जागृती, हिंगणे स्त्री संस्थेतून संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे संस्थाकारण यातून लेखन झालेले आहे. ठळकपणे लक्षात येण्याजोगी श्रीमती मालतीवाई बेडेकर,श्रीमती कृष्णाबाई मोटे, श्रीमती शांताताई निसळ, श्रीमती शशिकला जाधव अशा लेखिकांनी संस्थेकडे येणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या लिहिलेल्या आहेत समाजशास्त्राच्या अभ्यासात ज्याला 'केस स्टडी' म्हणतात त्याला आपण 'विशिष्ट प्रकरण' म्हणू आणि असे करतांना प्रकरण शब्दाला असणारे कुत्सित अस्तर काढून टाकू. कोणत्याही अभ्यासात सूक्ष्म( Micro)आणि बृहत् (Macro) या दोन्ही स्तरांचा परस्पर अन्वय लावून पाहावे लागते.

 विशिष्ट काळातील स्त्रियांच्या समस्यांचा वा ग्रामीण महिलांच्या समस्या असा कोणताही कालसापेक्ष छेद घेतला तरी त्याच्या गाभ्यात विशिष्ट प्रकरणे आणि त्या त्या प्रकरणातील विशिष्टता असते. शिवाय शैलाताईसारख्या कार्यकर्त्या त्या संस्थांमध्ये काम करतात त्या संस्थांमध्ये येणाऱ्या मुलींचे माणूस म्हणून - व्यक्ति म्हणूनही काही प्रश्न असतात. नोकरशाहीच्या काटेकोर चैकटीत न अडकता कार्यकर्त्याला येणाऱ्या मुलीशी संवाद साधावा लागतो. परिस्थितीने झोडपलेल्या अशा एखाद्या व्यक्तीशी वागताना संयम आणि सहानुभूती असावी लागते. पण केवळ भाबड्या मायेत वाहून न जाता, येणारे नवे माणूस खरे बोलते आहे का? तेही पारखून पहावे लागते. खंबीर राहूनही नैतिक वडिलपणाचा चष्मा चढवून चालत नाही. शैलाताईंनी या संग्रहातल्या लेखात प्रत्येक प्रकरणाच्या विशिष्टतेला स्थान दिले आहे. काहीवेळा विशिष्टमुलगी संस्थेतून बाहेर जाते त्यावेळी तिच्या पुढच्या आयुष्याची दिशा मान्य करतात.
 हे लेख आपण वाचक म्हणून वाचाल. तेव्हा त्यातल्या एकेका लेखाविषयी मी काहीच लिहित नाही. पण हे सारेच लेख वाचताना माझ्या मनात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याविषयी लिहिते. वाचकांनाही त्यांच्या प्रतिक्रिया पडताळून पहाता येतील. घर, कुटुंब हे स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे असे नेहमी म्हटले जाते. पण हेच घरकुटुंब तिला गरज असेल तेव्हा आधार देत नाहीच.

तिच्या डायरीची पाने