पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




प्रस्तावना

 सामाजिक प्रश्नांविषयी उभ्या रहाणाऱ्या चळवळींमध्ये; विचारव्यूह, अनुभव आणि संस्थात्मक कार्य यांचे नेमके नाते काय असावे? प्राथमिकता आणि अग्रक्रम कशाला द्यावा? असे प्रश्न सतत पुढे उभे राहतात. कोणत्याही तीव्र सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या चळवळीत, अभ्यास आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचा मेळ कसा घालायचा? दूर पल्ल्याचा विचार आणि तातडीचे प्रश्न या दोन्हीचा आवाका पेलणारी कार्यपद्धती कशी निर्माण करायची हे निर्णय सोपे नसतात. चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना काहीवेळा दैनंदिन कामाला बांधून ठेवणारे संस्थात्मक काम नकोसे वाटते. पण ज्यांचे प्रश्न असतात त्यांना संस्थांचा आधार हवासा वाटतो. संस्था उभारणीचा आधार खरे तर कार्यकर्त्यांनाही होतो. पण त्यांचे भय वा शंकाही निराधार नसतात. कारण संस्थात्मक कामामध्ये काहीवेळा कार्यकर्त्यांचे प्रशासक होतात - चळवळीतील विचारांची धारा कमी होते, असेही होते. शेवटी प्रत्येक प्रश्नांभोवती उभ्या रहाणान्या चळवळीत परिणामकारकतेचाही मुद्दा महत्त्वाचा! निर्णय अनेकदा त्या अंगाने घेतले जातात.
 आज ही चर्चा करण्याचे कारण माझ्यासमोर प्रा. शैला लोहिया यांच्या ग्रंथाचे हस्तलिखित आहे. शैलाताई आणि त्यांचे पती डॉ. व्दारकादास लोहिया अनेकवर्षे आंबेजोगाई येथे कार्य करीत आहेत. ग्रामीण भागात कार्य करताना एककलमी कार्यक्रम आखता येत नाहीत या जाणिवेने 'मानवलोक' 'दिलासा' 'मनस्विनी प्रकल्प' आणि गांवागांवातील शेतीपाण्याचे प्रकल्प असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. पण या पुस्तकातील लेखांचा संदर्भ आहे तो स्त्रीप्रश्नांचा! वेगवेगळ्या कारणाने डोक्यावरचे छप्पर गेलेल्या स्त्रियांना 'दिलासा' त आश्रय मिळतो. ही येणारी प्रत्येक मुलगी - बाई म्हणजे एक कथाच असते. या विविध मुलींच्या ज्या