पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणे. त्या भाड्याला कुणी दोष दिला नाही. मग दुसऱ्याच दिवशी ती झोपडी खाली केली. एस्टी स्टँडवर लई वेळ बसून ऱ्हाईले. कुठं जावं कळेना. मग नाइलाजानं आईच्या दारात गेले. तिनेपण शिव्या दिल्या. म्हणाली, बाप यायच्या अगूदर काळं कर. तू दिसली तर तुजा गळा कापील नि जाईल जेलात. त्यो जेलात गेला तर या पसाऱ्याच्या तोंडात काय कोंबू? एवढी भाकर खा. पानी पी. हे पन्नास रुपये घे नि काळं कर. सावत्र आईच. पण तेवढी दया केली बघा. मग पुना स्टँडवर आले. दिसल त्या गाडीत बसले नि इथे अंबाजोगाईत पोचले. रस्त्यावरून हिंडताना एका ब्युटिपार्लरची पाटी दिसली. तिथं आत शिरले. सवितादीदीने मसाज करायला शिकवले होते. पंधरावीस दिवसांनी मीच दीदीचा चेहेरा साफ करून द्यायची. म्हटलं ही नोकरी मिळाली तर बरंच हाय. पन नशीब खोटं. त्या बाईच्या नवऱ्याची बदली झाली होती. ती चार दिवसांनी गावाला जाणार होती. तिनेच तुम्हाला फोन केला नि मला संस्थेत आणले. लई उपकार केले बाबा!"
 अशी होती मीराची कहाणी. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील राहाणीमान अंगी पडल्यामुळे मीराला इतर मुलींच्यात मिसळणे जमत नसे. खेड्यात वाढलेल्या इतर स्त्रिया डोक्याला पचपचून तेल लावीत. तर या बाईसाहेब नहायच्या आदल्या रात्री खास तेल लावणार. दिलासातील महिलांना हातखर्चासाठी संस्था शंभर रुपये देते. पण तेही तिला अपुरे वाटत. मुलगी वा बाई दिलासात रुळली की आम्ही त्यांना गटाने खरेदीसाठी, उदा. भाजी आणणे वगैरे साठी पाठवीत असू. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, संस्थेविषयी आस्था निर्माण व्हावी, निर्णय घेण्याची क्षमता यावी हा यामागे हेतू होता. एक दिवस तक्रार आली की मीरा भाजीला गेली की हॉटेलमध्ये चहा पिण्याचा हट्ट धरते आणि तडीलाही नेते. लहान गावात विशिष्ट १-२ उपाहारगृहे सोडली तर स्त्रिया हॉटेलमध्ये जात नाहीत. छोट्या गावात सगळे सगळ्यांना ओळखतात. हॉटेल मालकाचाच एक दिवस फोन आला, भाभी पोरीची नजर चंचल वाटते. तिला सांभाळा.... उगा आफत यायची. लोक काय वाईटावरच असतात. मी मुद्दाम फोन केला."

 एरवी मीरा इतकी गोड, हुशार, बोलण्यात तरबेज, वाचनाची आवड. काय करावे हे सुचेना. आमच्या एका कार्यकर्तीने सुचवले की मीच तिला

मीरा
३३