पान:तिच्या डायरीची पाने.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परंतु स्वतः कमावत्या - रोजंदारीवर असल्याने माहेरी त्या बिनधास्तपणे राहू शकतात. शिवाय 'नवऱ्याने टाकलेली बाई' ही गोष्ट मध्यमवर्गीयांना जेवढी लपवावीशी वाटते तेवढी सर्वहारा समाजातल्या लोकांना लपवावीशी वाटत नाही.
 "नवरा म्हणतो, तुमची वस्तू डावी आहे, तरी पत्करली मी. तिला जन्मभर सांभाळायचं तर तिच्या बापानी अधुनमधून पैसा लावायलाच हवा. वायको म्हंजे वस्तू वाटते त्याला. कधीपण वापरावी नि कधीपण फेकून द्यावी असं कसं हो?" सुनंदा तडकून विचारते. ही दिसायला खूप काळी. नवरा पुण्याला सरकारी खात्यात ड्रायव्हर आहे. ही बापाची एकुलती एक म्हणून लग्न केलं. एक मुलगाही आहे. नवऱ्याने पुण्याला दोन वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस कोर्टाच्या समन्सला याने दाद दिली नाही. पण आता मात्र समन्स त्याला पोचले आहे. आपल्याला पोटगी द्यावी लागेल या भीतीने तो पुण्याहून गुंड घेऊन येतो आणि सुनंदाच्या घरासमोर जाऊन शिव्या धमक्या देतो. पोलिसांकडे दाद मागितली तर ते लक्ष देत नाहीत. साधा अर्ज दाखल करण्यासाठी कुणाची तरी चिट्ठी लागते. सुनंदा मात्र धीराने उभी आहे. आई - वडिलांच्या सहाय्याने मुलाला वाढवते आहे. मात्र भेटली की एकदा तरी विचारते, “भाभी, माझा मुलगा तर तो नेणार नाही ना? तेवढा माझा मला राहू द्या. मग कशालाच डरत नाही मी. कोर्ट मुलाचा ताबा तर नवऱ्याला देणार नाही ना!" काय उत्तर देणार आपण? शेवटी पोलीस आणि न्यायाधीश या समाजाचेच घटक. समाजातील वकील असोत, खोट्या साक्षी देणारे निविलेले, साक्षीदार असोत, किंवा कायदा करणारे तज्ज्ञ असोत ते या समाजाचे घटक असतात.
 समाजात स्त्री विषयी जी भूमिका रुजली आहे तीच त्यांनी घेतली तर कोणी कोणाला बोल लावायचा? समाजमनातील स्त्रीचे चित्र बदलायचे असेल तर तळापर्यंत पोचायला हवे.

 समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयोग म्हणजेच मानवलोक वा मनस्विनीसारख्या सामाजिक संघटना वा संस्था, आज परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरावे यासाठी झगडणाऱ्यांची संख्या वाढतेय.
 या ठिकाणी एक गोष्ट आठवते. जी रामशास्त्री प्रभुण्यांच्या नावाने सांगितली जाते. एक लाल लुगड्यातली विधवा उत्तम प्रवचन करीत असे. प्रवचन ऐकावयास

१६
तिच्या डायरीची पाने