पान:तिच्या डायरीची पाने.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रामशास्त्री आलेले पाहून तिने प्रश्न केला, “ शस्त्रीजी, स्त्री आणि पुरुष निसर्गतः सारखीच. असे असताना स्त्रिया व पुरुषांना दुहेरी न्याय का? पती मरण पावला तर वाईला विद्रूप केले जाते. अशुभ मानले जाते पण पुरुषाची पली मरण पावली तर पंधराव्या दिवशी तो दुसरा विवाह करतो असे का?" शास्त्रीजी उत्तरले, "बाई, तुमचे म्हणणे खरे आहे. न्याय देणारे आणि न्यायासाठी कायदे करणारे पुरुषच! एक वेळ अशी येईल, त्यावेळी तुमच्यासारख्या स्त्रिया कायदे तयार करतील. न्यायदान देण्यासाठी आसनस्थ होतील तेव्हा स्त्रियांना जरूर न्याय मिळेल."
 स्त्रीमुक्तीसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे संसार, 'कुटुंब नाकारणाऱ्या, मुक्त लैंगिक संबंधाची भलावणी करणाऱ्या बायका.' अशी भूमिका स्वतःला संस्कृतीरक्षक समजणारे सोयिस्करपणे पसरवीत असतात. त्यांना काय माहीत की स्त्रीला घर हवे असते. मात्र ते शोषणमुक्त हवे. जिथे स्त्रीला माणूस म्हणून सन्मान असतो, प्रगतीची संधी असते ते घर तिचेही असते.
 बाईचं 'माणूसपण' समाजाला मान्य करायला लावताना शेकडो कोस अनवाणी चालत जावे लागणार आहे. पण अनेकांचे .... सुजाण स्त्री-पुरुषांचे हात जेवढे वाढतील तेवढे हे अंतर सोपे आणि जवळचे होणार आहे. भारतीय तत्वज्ञान 'आत्म्याचे' अस्तित्त्व मानते. मग आत्म्याला जात असते का? लिंग असते का? स्त्रीच्या सतत जळणाऱ्या आत्म्याची कोणती सोय आम्ही लावली?

आत्मा चालला उपासी, दूरदूरच्या गावाले
माय मातीच्या कानांत, दोन सवाल पुशीले…
गांठ गांठ पदराला, वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता, पुढे निघाली पालखी
पालखीत कोण राणा? त्याले काय रूप रंग?
कुण्या जातीचा पालव,आता डोईवर सांग…
कुंकवाचं देन-घेणं. काळ्या मण्यांचा वायदा
परदेशी पराईण, तिले कोनाचा कायदा?
काया मातीची वाकळ, आता मागेच सुटली

१७