पान:तिच्या डायरीची पाने.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं? विधवा आई. मग सहा महिने 'दिलासा'त होती. शारदाचा नवरा दारू प्यायला की पशू होत असे. शुद्धीवर असतांना मात्र शारदावर खूप प्रेम केले होते. त्या प्रेमाच्या आठवणी ती विसरू शकत नव्हती. भावाच्या, आईच्या रेट्यामुळे ती कोर्टात गेली. कोर्टातून काडीमोड घेतला. पण तरीही मन त्याच्यातच घुटमळत होतं. ती प्रौढ साक्षरता वर्गाची शिक्षिका झाली. आईकडे राहू लागली. एक दिवस ढगेबाईनी बातमी आणली की शारदा नवऱ्याबरोबर राहू लागली आहे! आम्ही चक्रावून गेलो. दोन चार दिवसांत शारदा स्वतः आली.
 "मी नवऱ्याबरोबर राहण्याचं ठरवलं आहे. त्यांनी दारू सोडलीय, नि गाव सोडून ते इथंच राहायला तयार आहेत. इथेच काहीतरी काम करतील. मी पण कष्ट करीन. त्यांना पश्चात्ताप झालाय. कसं करू मी? तुमचाही धाक राहील." शारदाने सांगितले.... आणि गेले वर्षभर दोघंही सुखाने राहात आहेत. शारदाच्या मामाच्या जोडीने नवरा रंगाच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. मेहनत करतो. आता दारूचं म्हणाल तर ती पूर्णपणे सुटलेली नाही. कधीतरी घेतो. पण पूर्वीसारखा धिंगाणा घालत नाही.
 आता शारदाच्या बाबतीत आम्ही हरलो की जिंकलो? खरे तर इथं हारजीत हा प्रकार नाहीच. प्रत्येक समस्या वेगळी आणि तिचं उत्तरही वेगळं, कोणत्याही पुस्तकात न सापडणारं.

 गेल्या चार-पाच वर्षात झालेल्या कामाचे एकूण मूल्यमापन एका तज्ज्ञ मित्रानी केले होते. आलेल्या स्त्रियांत बहुजन समाजाच्या स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत. म्हण, मारवाडी, कोष्टी, जैन, मुस्लिम, न्हावी इत्यादी समाजातीलही आहेत. पण दलित समाजातील स्त्रिया त्या मानाने कमी आलेल्या दिसतात. संस्था या स्त्रियांपर्यंत पोचली नाही की या स्त्रियांना हे प्रश्न जाचत नाही? असा प्रश्न समोर ठाकला, प्रश्नाचं उत्तर शोधताना लक्षात आलं की, मागास समाजातल्या स्त्रिया प्रत्यक्ष दिलासा घरात राहाण्यासाठी अवघ्या चारपाचच आल्या असल्या तरी मोफत मदत केंद्रात त्या मोठया प्रमाणावर आल्या आहेत. मध्मवर्गीय वातावरणातील स्त्री पुष्कळदा परावलंबी असते. त्यामुळे तिचा आधार नवऱ्याच्या घरातून बाहेर पडताच पार तुटून जातो. पण मागासवर्गातील स्त्री आर्थिकदृष्ट्या अपंग होत नाहीत. उरतो प्रश्न कायद्यच्या मदतीचा. तो घेण्यासाठी त्या येतात.

१५