पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे दुःख केवळ सुशिलेचे नाही. नि ते आजचे नाही. हजारो वर्षापासूनचे हे ओझे अजूनही मानेवर वसलेले आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधतांना, हरवून जाणे एवढेच हाती आहे आमच्या. भिंतीवरचे जुनाट कळाहीन चित्र बदलायचे तर दुसरे नवे चित्र कोणते लावता येईल याचा विचार करावाच लागतो. कोऱ्या भिंतीचा स्वीकार करण्याची हिंमत सर्वाच्यात नसते.

 केवळाबाईचे दःख चटका लावणारे. "मानूस कंदीतरी मरायचाच हो. पण निदान शेवटच्या सुखदःखाच्या गोष्टी तरी करायला मिळाल्या का? आजारी असते तर डोक्यावर हात फिरवून म्हणाले असते की "पोरांना सांबाळ". डोळंभरून बघताबी आलं नाही हो. पाच वरसं झाली, पन वाटतया आताच घडलय." सालेगांव जवळच्या कोराळहून शिवण क्लासमध्ये येणाऱ्या त्या दोन तरुण विधवा. दोघींची कहाणी एकच. दोघीही निरक्षर. निसर्ग नियमानुसार शहाण्या झाल्या. वयात आल्या नि लगेच लग्न करून दिले. दोघीचे नवरे मुंबईत मजुरी करणारे. तुर्भ्याजवळच्या झोपडपट्टीत रहात असत. एकीला मूलबाळ नाही तर दुसरीला दोन लहानगी आहेत. त्याही मोलमजुरी करीत. एक दिवस एकीचा नवरा घरी आलाच नाही. अपघाती मरण झाले. ते दोन दिवसांनी कळले. दुसरी माहेरी होती. बाळंतपणासाठी. नवऱ्याने का कुणास ठाऊक पण आत्महत्या केली म्हणे. दोघींनी जेमतेम विशी पार केलेली. गेल्या दोनअडीच वर्षापासून माहेरी रहातात. या भूकंपामुळे त्यांना वेगळीच वाट सापडली. अनेक स्वयंसेवी संस्था या परिसरात स्त्रियांसाठी; त्यांच्या विकासासाठी काम करतात. शिवणवर्ग, अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यातली इंदुकला म्हणते "मी धाकट्या लेकराला जवळ घ्यायची न्हाई. बापमाऱ्या वाटायचा. बाप गेला नि दोन महिन्यांनी जलमला. कुनाशी मी बोलायची नाई. मरेस्तो काम करायची. व्हता तेव्हा नवरा बी दारू पिऊन तरास द्यायचा. पन कंदीतरी त्याला हवीशी वाटले की डोईवरून हात फिरवी. आता काय आहे? जगण्यात रामच नाही. पण ताईंनी लईच आग्रेव केला. शिवण शिकायाचा निमित्तानं इथं यायला लागले. नी जग दिसाया लागलं. परकर … टोपडी … निकर… सारं शिवते. आता मशीन साठी बी थोडे पैसे साठवलेत. थोडे ताई देणारेत …" आज तिचे शिवणाचे काम झोकात उभे आहे. विवेक तिसरीत गेला आहे. लक्ष्मीचाही असाच अनुभव. ती सतत झोपून

हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या
११९