पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गती, व्यस्तता की हव्यास व्यग्रता?

 आज माणूस गतीचा गुलाम आहे की हव्यासाचा बळी हेच कळेनासं झालं आहे.गेल्या शतकात शहरं गतिशील होती. आज रस्ते, पूल झाले.सायकलची जागा मोटारसायकलींनी घेतली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या गावी मुक्कामाची एस.टी. येऊन थांबते, याचा कोण अभिमान होता गावकऱ्यांना.आज गाव एस.टी. आणि सीटी बसच्या शटल सर्व्हिसनी घुसळून निघालाय.त्यात भरीस भर म्हणून बसचे किफायती पास आले नि खेडे नि शहरातलं अंतरच संपून गेलं. शहर, तालुक्यालगतची गावं, तिथली माणसं मुंबईच्या लोकलनी फिरणाऱ्या माणसांसारखी लोकल झालेल्या बस, वडापच्या टॅक्स, मोटारसायकल्समुळे गतिशील होऊन गेलीत. शहरात काय नि खेड्यात काय. सगळेच ऐंशीनी पळताना दिसतात.
 या गतीमुळे मात्र माणूस माणसात राहिला नाही. पूर्वीचे जीवाभावांचे संबंध आता औपचारिक होत चालले आहेत. अगदी जीवलग मित्रांची भेट एकतर लग्नात होते नाहीतर कुणाच्या तरी मयताला. स्मशानभूमीत पूर्वी कोण गांभीर्य असायचं. आता रविवारी रक्षाविसर्जन असेल तर तिथे झालेली गर्दी, गोंगाट बघून हा बाजार आहे की जत्रा असा प्रश्न पडतो. सारं उपचार म्हणून सुरू असतं. तिथली उपस्थिती म्हणजे भोज्याला पाय लावणं असतं. पळाऽऽ पळा कोण पुढे पळतो अशीच सारी स्पर्धा!

 ते केवळ जीवनाची गती वाढली म्हणून झालं असं जर कोणी म्हणत असेल तर ते अर्धसत्य होय. माणसाचं धापा टाकत पळणं पाहिलं की लक्षात येतं - माणूस हव्यासामागे पळणारा यक्ष झालाय! त्याला मृत्यूनंतर साडेतीन हातच जमीन लागते ही माहीत असलं तरी पळेल तितकी जमीन

जाणिवांची आरास/५५