पान:चित्रा नि चारू.djvu/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चि त्रा च्या
व डि लां ना
वे ड ला ग ते

♣ * * * * * * ♣








 बळवंतरावांनी सर्वत्र शोध केला, परंतु चित्राचा पत्ता नाही. त्यांची रजाही संपली, अधिक रजा मिळणे शक्य नव्हते. ते परत आले. कामावर रुजू झाले. परंतु त्यांचे कशात लक्ष लागेना. कामातही लक्ष लागेना.

 बळवंतरावांना एकदम मामलेदारी मिळाली होती. त्याचे काहीना वैषम्य वाटत होते. बळवंतरावांचा मत्सर करणारे लोक होते. खुद्द त्यांच्याच कचेरीत असे लोक होते. बळवंतराव अलीकडे कामाविषयी जरा बेफिकीर होते. ते काही गावांना न जाताच त्या गावी जाऊन आलो म्हणून कामाच्या डायरीत लिहीत. त्यांच्या आता लक्षातही फारसे राहात नसे. त्यांचा मेंदू काम देईनासा झाला.

 या संधीचा दुष्टांनी फायदा घेतला, कलेक्टरकडे निनावी पत्रे गेलं.मामलेदारसाहेब न हिंडताफिरताच डायरी वगैरे भरतात असे कळवले गेले. कलेक्टर जरा कडवा होता. तो अकस्मात् एके दिवशी येऊन दाखल झाला. चौकशी करू लागला. कामाची डायरी पाहू लागला.

 "या गावांना गेले होतेत का तुम्ही ? नोंद तर आहे. गेले होते का ? " कलेक्टरने विचारले.

 "मला आठवत नाही."

 "सरकारी काम म्हणजे का हजामती ? आठवत काय नाही ? बिनआठवणीचा अधिकारी काय कामाचा ? येथे गावांची नावे भराभर लिहायला बरी आठवली !"

 "गेलो असेन मी." बळवंतराव म्हणाले.

चित्रांच्या वडिलांना वेड लागते * ५३