"सासूने मारले वाटते ? " रामू म्हणाला.
"लग्न नाही झाले, तोच कशी सासू मारील ? राम, आधी लग्न ठरावे लागते. मग होईल. मग सासू मारील. होय ना ग आई ? " श्यामूने जरा प्रौढपणे जणू विचारले.
"परंतु ताईला चांगलीच सासू मिळेल." सीताबाई म्हणाल्या.
"निदान नवरा तरी चांगला मिळेल." बळवंतराव म्हणाले.
"ताई, तू बऱ्याच उंचावरून पडलीस ?" रामूने विचारले.
" हो." ती म्हणाली.
" तू रडली असशील ! " दामू म्हणाला.
" मग डोळे कोणी पुसले ?" रामूने विचारले.
" नव-याने !" श्यामू हसून म्हणाला.
" परंतु लग्न झाले म्हणजे तो खरा नवरा. तूच ना म्हटलेस ?" रामू म्हणाला.
" जा ना रे बाहेर. तिला पडू दे. आणि ताईच्या लग्नावी अशी टिंगल का करायची ? पुन्हा भलभलते बोलाल तर बघा." बळवंतराव जरा रागाने म्हणाले.
"ती मुले बाहेर गेलो. चित्रा आपल्या खोलीत जाऊन आंथरुणावर पडली. तो रडत होती. का बरे ? तिचे का कोपर जास्त दुखत होते ? कपाळाची जखम दुखत होतो ?
रात्री सीताबाई व बळवंतराव बोलत होती.
" ती दोघे एकमेकांजवळ बोलली. एकमेकांना आवडली. मोकळी आहेत त्यांची मने, चारू खरेच सुंदर मुलगा आहे. जमले तर आपली चित्रा द्यावी तेथे." बळवंतराव म्हणाले.
" माझी हरकत नाही. जहागीर आहे. एकुलता एक मुलगा आणि मुलगाही फार चांगला आहे म्हणता." सीताबाई म्हणाल्या.
"स्वरूपाने सुंदर व गुणांनीही सुंदर आहे. असा मुलगा मी पाहिला नाही, आणि चित्रा व तो चारू, जणू पूर्वीची ओळखीची अशा त-हेने बोलत होती. काय ऋणानुबंध आहे कळत नाही. आपली तरी इकडे लांब बदली होईल असे कोणाला वाटले होते ? जणू चित्राच्या लग्नासाठीच