पान:चित्रा नि चारू.djvu/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "खरेच, घाई कशाला रावसाहेब ? " जहागीरदार म्हणाले.

 "बरे बघू मग. आता आधी जेवून घेऊ. " रावसाहेव म्हणाले.

 पाटपाणी तयार होते. बळवंतराव, चित्रा, जहागीरदारसाहेब बसले पानांवरून.

 "आणि तुमचे चारू नाही का बसत ? " चित्राने विचारले.

 " तो वाढायला थांबेल." जहागीरदार म्हणाले.

 " अय्या, बायकांचे काम का ते करणार ? मग मीच थांबत्ये. मी वाढत्ये. मला भूकसुद्धा नाही लागली. आता तर फळे खाल्ली. वाढू का मी ? " चित्राने विचारले.

 " चारू, तू सुद्धा बस. रामाच वाढील. सारे चालतेच आपणाला, " जहागीरदार म्हणाले.

 " रामाच्या ऐवजी रहीम असता तर चालता का हो वाढायला ? " चित्रेने विचारले.

 " चित्रा, पुरे आता." बळवंतराव म्हणाले.

  पाने वाढलो गेलो. सारी बसली. चित्राचे पान रिकामे होईना.

 "चित्रा, आटप की. " पित्याने सांगितले.

 "पोट भरलेले आहे." ती म्हणाली.

 "जेवल्यावर मळ्यात हिडा-फिरा. झोके घ्या, सारे पचून जाईल.” चारू म्हणाला.

 "परंतु बाबा म्हणतात, उन्हात जाऊ नको. चित्रा म्हणाली.

 "परंतु झोका झाडाला आहे. तेथे ऊन नाही." चारू म्हणाला.

 "जेवल्याबरोबर का कोणी झोके घेतात ?" ती म्हणाली.

 "जेवल्यानंतर जरा झोपून मग घ्या. येयल्या विहिरीचे पाणी पाचक आहे. काही बाधत नाहो. होय ना बाबा ? " तो म्हणाला.

 “होय. फार छान पाणी." जहागीरदार म्हणाले.

 "मला हा मळा फार आवडला. येथेच राहावे, मोट आहे, फुले आहेत. झोका आहे, फळे आहेत. " चित्रा यादी सांगत होती.

 “ आणखी काय काय आहे? पित्याने हसून विचारले.

चित्रेचे लग्न * २१