पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै० जावजी दादाजी चौधरी. होते हे सर्वानुभूतच आहे. अगदी परक्याचे गुणांवरून एकाद्याची खरी कदर तर होणें नाहींच; पण स्वकीय मंडळीच्या योगानें ज्याची प्रख्याती होते अशा लोकांच्या प्रख्यातीचे व योग्यतेचे दर्जे या जगांतील अनुभवाने समंजस लोक लावतात, व तशाच प्रकारे सदरील उद्धृत वाक्यांत कवीने लावले आहेत. आज ज्याप्रमाणे स्वत:च्या प्रयत्नाने मनुष्यास पुढे येण्यास सुयोग आहेत त्याप्रमाणे आमच्या इकडील पूर्वराजांचे काळी नव्हते. आमचे इंग्रज सरकार स्वतः प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांचे सर्व आचार विचार प्रयत्नवादित्वाचे धोरणाचे असतात. त्यांचा सर्व इतिहास अव्वलपासून तों आजवरपर्यंतचा, खुद्द त्यांचे देशांतील ह्मणा किंवा ज्या ज्या ठिकाणी इंग्रज लोकांचा संबंध पोचत आहे त्या त्या ठिकाणींचा ह्मणा, या प्रयत्नवादित्वाची पूर्ण साक्ष भरीत आहे. “सांगे वडिलांची कीर्ति । तो एक मूर्ख जाणावा' हे तत्त्व त्या लोकांस नुसतें आसच्याप्रमाणे मान्य आहे इतकेच नव्हे पण तें त्यांच्या कृतीत देखील ठळक उमटलेले दिसते. 'बडे बापका बेटा' हा प्रकार त्यांच्या तिकडे फारच कमीकिंबहुना नाहींच असें ह्मटल्यास चालेल. त्यांची गृहस्थिति व त्यांचा दायभाग हीही स्वतःप्रयत्नाला अत्यंत पोषक आहेत. त्याचप्रमाणे 'चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः ' हे जें खरें, उन्नत व उदार तत्त्व हे केवळ भगवद्गीतेंत राहून पाठोपयोगी होण्याचे नसून त्या लोकांच्या प्रत्यही व्यवहरांत जागरूकतया दृष्टोत्पत्तीस येते. तेव्हां अशा लोकांचा आमच्याशी संबंध असणे ईश्वरास मंजूर असल्यामुळे तो संबंध आजकाल जुळून आला आहे. व त्या संबंधाचे मागन येणारी जी कांहीं बरी वाईट स्थिति यावयाची तीही आमांस प्राप्त झाली आहे. आतां मनुष्याला केवळ आपल्या अंगच्या किंवा संपादित गुणांम जमा येण्यास सांपडते, हा सुयोग त्या बऱ्या स्थितीतील मुख्य अंग होय. आमचे इंग्रज राज्यकर्ते आह्मांस लाभतपर्यंत हा सुयोग आमचे पूर्वीचे राज्यकर्त्यांचे कारकीर्दीत इकडील लोकांस फारच कमी होता, किंचा नव्हता असें ह्मणण्यासही फारसा प्रत्यवाय नाही. कदाचित् तसा पूर्वी सुयोग असल्यास तो इतिहासाभावामुळे आमांस जसा दिसावा तसा दिसत नसेल. कोणतेही कारण असो, पण आज तरी तसा सुयोग पूर्वी होता असें ह्मणणे जरा विचाराचेंच आहे असें कबूल करावे लागते. खऱ्या गुणविकासाला कालानुकूल्य अवश्य