पान:गांव-गाडा.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२      गांव-गाडा.

ण्याची सोय झाल्यावांचून त्यांचा व एकंदर समाजाचा व्यवहार सुरळीतपणाने चालणार नाही.

 सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फारा दिवसांच्या वहिवाटीने जातिजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण उत्सव व कुलधर्म, आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षकांचे हक्क सध्यांच्या काळी चालविण्यात आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदु समाजाला भंडावून सोडले आहे. त्यामुळे अनेक अडचणी सोसाव्या लागतात, आद्याची तोंडबंदी होते, आणि ढोंगीपणा व लपंडाव वाढतात, हे बहुजनसमाजाच्या मनांत सुद्धा येत नाही. महारमांगांखेरीज कोणत्याही जातीने वड, पिंपळ जाळतां कामा नये; त्यामुळे वसवा एकाला आणि सरपण दुसऱ्याला अशी स्थिति होऊन महार, मांग, मुसलमान ह्यांना फुकटफाकट सरपण मिळतें. ब्राह्मणाने स्नेह विकू नये ह्या आडकाठीमुळे घरीं खिल्लार असले तरी हा कोरडा राहतो. गिरण्यांमध्ये तयार झालेलें रंगी-बेरंगी बुंदक्यांचे पातळ अगर हव्या त्या रंगाचें चीट ह्यांना रंगीत सुताच्या लुगड्यापेक्षां विटाळ कमी धरतात; त्यामुळे गरीब साळ्याकोष्ट्यांची गिऱ्हाइकी नाहक घटते. वैदूंनी कंदुरीसाठी बकर मारले तर त्याचे कातडे विकू नये, तें विकणाराला विभूति लावून जातीबाहेर टाकतात; ह्यामुळे महार कसई ह्यांची चंगळ उडते. खुटेकर धनगरांना जाते, कंजारणीला सूप, फांसेपारध्यांना दिवा व जोडा, अशा अनेक अनेगा आहेत. शेवगांव तालुक्यांतील मढीच्या कान्होबाला तेल ( चुना) लावले म्हणजे मढी, निवडुंगें वगैरे गांवीं रानांत नांगर फिरत नाही, बाळंतिणी देखील बाजेवर निजत नाहीत. अशा प्रकारच्या प्रत्यवायांनीं