पान:गांव-गाडा.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २४३

धर्माचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा अनेक बाबतींत जातिजातींची व गांवांची हानि व गैरसोय केली आहे. जातिजातींच्या दोषांचे ओंगळ स्वरूप कसें दिसनासे झाले आहे ते पहा. महार, मांग, हलालखोर वगैरेंना व त्यांच्या पदरांत उष्टया पत्रावळी टाकणारांना त्याबद्दल कांहींच दिक्कत वाटत नाही. उलट उष्ट्यासाठी वरील जाती धरणे घेतात. कशानेही ढोर मरो महारमांग त्याची 'माती' खातात; कोणी दिली नाहीं तर आम्ही उपाशी मेलों अशी ओरड करतात, व ह्या हक्कासाठी थेट सरकारापर्यंत भांडतात. व्यक्तिशः खाणाराच्या आणि एकंदर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अनाचार किती घातक आहेत बरें ? ख्रिस्ती झालेले महार मांग सुद्धा वरील अनाचार सोडीत नाहीत; व ह्या कामांत मिशनऱ्यांची सर्व विद्या व मंत्र लटपटतात, हे पाहून उमेद खचते. नानाधर्मांचे व पंथांचे शंख व सोट भिक्षुक आपले आयुष्य भंगडपणांत, फुकटखाऊपणांत घालवितात. देवाची चाकरी करण्याला फुरसत सांपडावी म्हणून आपण भिक्षा मागतों, ही त्यांची समजूत खोटी आहे. भिक्षेलाच हे लोक धर्म आणि वतन समजतात. तसेच अनेक देवदेवतांचे ब्राह्मणेतर भिक्षक म्हणतात की, आमचे उपास्यदैवत आम्हांला भिक्षेशिवाय दुसरा धंदा सुखासमाधानाने करूं देत नाहीं, व लोकही ते खरे मानतात. हा उभयपक्षी केवढा भ्रम आहे !

 धर्मविधि म्हणून ठग द्रव्यापहार व प्राणापहार करीत, हे सर्वांना माहीत आहेच. व्यभिचारी आणि गुन्हेगार पंथ व जाती ह्या जातिधर्माच्या अतिरेकाचे अत्यंत कटु फल होत. व्यभिचारी पंथांत प्रमुखत्वे वाघ्ये, मुरळ्या, हिजडे, जोगतिणी, भाविणी येतात. अल्लडपणीं जरी त्यांना खाण्यापिण्याची व लेण्यानेसण्याची चंगळ वाटून आपल्या पंथांत काही गैर दिसत नाही, तरी प्रौढपणी कित्येकांना आपल्या जिण्याचा वीट येतो. ह्या विषयाकडे सरकारचे लक्ष लागले आहे, आणि लहानपणी मुलें देवाला वाहण्याच्या घातक संप्रदायाचे निर्दलन होईल अशी खात्री वाटते. व्यभिचारी जातींत कोल्हाटी, हरदास, रामजानी, कसबी